AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shoaib Akhtar: शोएब अख्तरने आधी हसत-हसत VIDEO पोस्ट केला आणि नंतर….VIDEO

"तुला आणि तुझ्या देशाला जे शब्द ऐकायला आवडणार नाहीत, ते तुम्ही आम्हाला बोलायला का भाग पाडता? पण तुम्ही त्या लायक आहात"

Shoaib Akhtar: शोएब अख्तरने आधी हसत-हसत VIDEO पोस्ट केला आणि नंतर....VIDEO
Shoaib-AktharImage Credit source: instagram
| Updated on: Nov 03, 2022 | 1:13 PM
Share

लाहोर: टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप सुपर-12 राऊंडमध्ये बुधवारी तिसरा विजय मिळवला. टीम इंडियाने बांग्लादेशवर 5 रन्सनी मात केली. हा सामना खूपच रोमांचक ठरला. भारतीय टीम एकवेळ बॅकफूटवर होती. बांग्लादेशची टीम ड्रायव्हिंग सीटवर होती. पण पाऊस आला आणि त्यानंतर सर्व खेळच बदलला. टीम इंडियाने कमालीची गोलंदाजी करुन सामना जिंकला. भारताच्या विजयानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर खूप ट्रोल झाला.

खूप आनंदात होता

भारतीय टीम अडचणीत असताना शोएब अख्तर खूप आनंदात होता. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर करुन त्याने आपला आनंदही व्यक्त केला. बांग्लादेशच्या ओव्हरमध्ये 7 वी ओव्हर सुरु असताना पाऊस सुरु झाला. पावसामुळे मॅचची 40 मिनिट वाया गेली. पावसामुळे खेळ थांबला, त्यावेळी बांग्लादेशची टीम डकवर्थ लुईस नियमानुसार 17 रन्सनी पुढे होती. म्हणजे मॅच सुरु झाली नसती, तर टीम इंडियाचा पराभव निश्चित होता.

शोएब अख्तरचा आनंद टीम इंडियाने हिरावला

शोएब अख्तरने त्याचा आनंद व्हिडिओमध्ये व्यक्त केला. बांग्लादेशच्या ओपनर्सनी ज्या पद्धतीने भारतीय गोलंदाजांची फँटी लावली आहे, ते पाहून मजा आली. हे सर्व बोलताना शोएब अख्तर आनंदात दिसत होता. बांग्लादेश या मॅचमध्ये भारताला हरवू शकतो, असं शोएब म्हणाला. बांग्लादेशने ही मॅच जिंकली असती, तर पाकिस्तानची सेमीफायनल गाठण्याची शक्यता थोडी वाढली असती. पण टीम इंडियाने पावसानंतर खेळच पालटून टाकला.

जबरदस्त बॉलिंग आणि फिल्डिंगमुळे सामना पलटला

पावसानंतर खेळ सुरु झाला, त्यावेळी दोन चेंडूनंतर लिट्टन दास रनआऊट झाला. केएल राहुलने अप्रतिम थ्रो केला. त्यानंतर अर्शदीप सिंह आणि हार्दिक पंड्याने एकाच ओव्हरमध्ये 2-2 विकेट घेऊन बांग्लादेशला घेरलं. लास्ट ओव्हरमध्ये बांग्लादेशला विजयासाठी 20 धावा हव्या होत्या. अर्शदीपला या ओव्हरमध्ये एक चौकार आणि षटकार बसला. पण त्यानंतर त्याने कुठलीही चूक न करता टीम इंडियाचा विजय सुनिश्चित केला.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...