AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियातून बाहेर असल्याने चाहते नाराज, पण श्रेयस अय्यर खूश; असं का ते स्वत:च सांगितलं

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली. पण आशिया कप स्पर्धेतून डावलण्यात आलं. त्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे, श्रेयस अय्यर मात्र या निर्णयाने खूश आहे. त्याने या मागचं कारण स्वत:च सांगितलं.

टीम इंडियातून बाहेर असल्याने चाहते नाराज, पण श्रेयस अय्यर खूश; असं का ते स्वत:च सांगितलं
टीम इंडियातून बाहेर असल्याने चाहते नाराज, पण श्रेयस अय्यर खूश; असं का ते स्वत:च सांगितलंImage Credit source: PTI
| Updated on: Sep 08, 2025 | 4:16 PM
Share

श्रेयस अय्यर सध्या टीम इंडियाच्या वेशीवर उभा असून त्याच्या कमबॅकची वाट पाहात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याला संघात स्थान मिळालं नाही. इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत डावललं गेलं. तसेच आशिया कप स्पर्धेतही विचार केला गेला नाही. म्हणजेच श्रेयस अय्यरचा विचार हा वनडे सामन्यांसाठी केला जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरचे चाहते आणि त्याचा खेळा माहिती असलेले जाणकार नाराज झाले आहेत. आता श्रेयस अय्यरकडे इंडिया ए संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत निवड होण्याची शक्यता वाढली आहे. पण ऐनवेळी काय होईल सांगता येत नाही त्यामुळे चाहते चिंतेत आहे. दुसरीकडे आशिया कप स्पर्धेसाठी संघात निवडण्याचं कोणतंही दु:ख श्रेयस अय्यरला नाही. उलट त्याने आनंद व्यक्त केला ठआहे. त्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. असं बोलण्याचं कारण काय? चला जाणून घेऊयात..

श्रेयस अय्यरने एका पॉडकास्टमध्ये सांगितलं की, ‘जेव्हा तुम्हाला माहिती असते की संघात असणं आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याच्या लायक आहात, तरीही तुम्ही बाहेर असाल तर दु:ख होतं. पण जेव्हा तुम्हाला माहिती असतं की, खेळाडू सतत चांगली कामगिरी करत आहे आणि ते टीमसाठी चांगलं करत आहेत. तर तुम्हाला त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. शेवटचा तुमचा हेतू टीम इंडियाला जिंकवण्याचा आहे. जेव्हा टीम जिंकत असते तेव्हा सर्व खूश असतात.’ श्रेयस अय्यरने असं सांगून चाहत्यांच्या वेदनांवर मलम लावला आहे. टी20 संघात निवडलेले खेळाडू चांगले खेळत असून यश मिळत असल्याचं श्रेयस अय्यरने मान्य केलं.

श्रेयस अय्यरच्या चाहत्यांना या महिन्यातच गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. कारण आशिया कप स्पर्धा सुरु असताना वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन मालिकांसाठी संघाची घोषणा केली जाणार आहे. या संघात श्रेयस अय्यरला संधी मिळू शकते. कारण या स्पर्धेपूर्वी इंडिया ए संघाचा ऑस्ट्रेलिया ए संघाविरुद्ध सामना होणार आहे. या संघाचं कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आलं आहे. त्यामुळे त्याच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध पहिला सामना 16 सप्टेंबरपासून आणि दुसरा सामना 23 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.