AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियातून बाहेर असल्याने चाहते नाराज, पण श्रेयस अय्यर खूश; असं का ते स्वत:च सांगितलं

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली. पण आशिया कप स्पर्धेतून डावलण्यात आलं. त्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे, श्रेयस अय्यर मात्र या निर्णयाने खूश आहे. त्याने या मागचं कारण स्वत:च सांगितलं.

टीम इंडियातून बाहेर असल्याने चाहते नाराज, पण श्रेयस अय्यर खूश; असं का ते स्वत:च सांगितलं
टीम इंडियातून बाहेर असल्याने चाहते नाराज, पण श्रेयस अय्यर खूश; असं का ते स्वत:च सांगितलंImage Credit source: PTI
| Updated on: Sep 08, 2025 | 4:16 PM
Share

श्रेयस अय्यर सध्या टीम इंडियाच्या वेशीवर उभा असून त्याच्या कमबॅकची वाट पाहात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याला संघात स्थान मिळालं नाही. इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत डावललं गेलं. तसेच आशिया कप स्पर्धेतही विचार केला गेला नाही. म्हणजेच श्रेयस अय्यरचा विचार हा वनडे सामन्यांसाठी केला जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरचे चाहते आणि त्याचा खेळा माहिती असलेले जाणकार नाराज झाले आहेत. आता श्रेयस अय्यरकडे इंडिया ए संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत निवड होण्याची शक्यता वाढली आहे. पण ऐनवेळी काय होईल सांगता येत नाही त्यामुळे चाहते चिंतेत आहे. दुसरीकडे आशिया कप स्पर्धेसाठी संघात निवडण्याचं कोणतंही दु:ख श्रेयस अय्यरला नाही. उलट त्याने आनंद व्यक्त केला ठआहे. त्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. असं बोलण्याचं कारण काय? चला जाणून घेऊयात..

श्रेयस अय्यरने एका पॉडकास्टमध्ये सांगितलं की, ‘जेव्हा तुम्हाला माहिती असते की संघात असणं आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याच्या लायक आहात, तरीही तुम्ही बाहेर असाल तर दु:ख होतं. पण जेव्हा तुम्हाला माहिती असतं की, खेळाडू सतत चांगली कामगिरी करत आहे आणि ते टीमसाठी चांगलं करत आहेत. तर तुम्हाला त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. शेवटचा तुमचा हेतू टीम इंडियाला जिंकवण्याचा आहे. जेव्हा टीम जिंकत असते तेव्हा सर्व खूश असतात.’ श्रेयस अय्यरने असं सांगून चाहत्यांच्या वेदनांवर मलम लावला आहे. टी20 संघात निवडलेले खेळाडू चांगले खेळत असून यश मिळत असल्याचं श्रेयस अय्यरने मान्य केलं.

श्रेयस अय्यरच्या चाहत्यांना या महिन्यातच गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. कारण आशिया कप स्पर्धा सुरु असताना वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन मालिकांसाठी संघाची घोषणा केली जाणार आहे. या संघात श्रेयस अय्यरला संधी मिळू शकते. कारण या स्पर्धेपूर्वी इंडिया ए संघाचा ऑस्ट्रेलिया ए संघाविरुद्ध सामना होणार आहे. या संघाचं कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आलं आहे. त्यामुळे त्याच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध पहिला सामना 16 सप्टेंबरपासून आणि दुसरा सामना 23 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

Follow Us
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला.
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....