AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : लॉर्ड्स कसोटी सामन्यात शुबमन गिल थेट पंचांना भिडला, हातातून चेंडू खेचला आणि…

लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या टीम इंडियाने जबरदस्त सुरुवात केली. पहिल्या सत्रात तीन विकेट घेत इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं. यात नव्या चेंडूची भूमिका महत्त्वाची होती. पण पंचांनी घेतलेल्या निर्णयामुळे शुबमन गिलच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

Video : लॉर्ड्स कसोटी सामन्यात शुबमन गिल थेट पंचांना भिडला, हातातून चेंडू खेचला आणि...
Video : लॉर्ड्स कसोटी सामन्यात शुबमन गिल थेट पंचांना भिडला, हातातून चेंडू खेचला आणि...Image Credit source: PTI
| Updated on: Jul 11, 2025 | 5:02 PM
Share

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा चेंडूवरून वादाला फोडणी मिळाली आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच हा वाद पाहायला मिळाला. यामुळे टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिल चांगलाच भडकला होता. तसेच पंचांसोबत वादही घातला. फक्त गिलच नाही तर वेगवान गोलंदा मोहम्मद सिराजही पंचांच्या या निर्णयामुळे नाराज दिसला. हे सर्व काही घडलं ते चेंडू बदलण्यावरून.. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताने चांगली सुरुवात केली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने खेळ सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासातच तीन विकेट काढले. यात नव्या चेंडूची भूमिका खूपच महत्त्वाची ठरली. कारण हा चेंडू स्विंग आणि सीम करण्यास मदत करत होता. हा चेंडू सामन्याच्या पहिल्या दिवशी 80.1 षटकांचा खेळ संपला तेव्हा बदलला होता. त्यामुळे हा चेंडू चालेल असं वाटत होतं. पण हा चेंडू 10.3 षटकांचा खेळ झाल्यानंतरच बदलण्याची वेळ आली. त्यामुळे आता ड्यूक्स चेंडूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

इंग्लंडच्या डावातील 91व्या षटकातील चौथा चेंडू टाकत असताना मोहम्मद सिराज पंचांकडे गेला. तसेच चेंडूचा आकार बदलल्याची तक्रार केली. त्यानंतर पंच सैकत शरपुद्दौला याने साच्यात टाकून चेंडू चेक केला. त्यात चेंडूचा आकार बदलल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर चेंडू बदलण्याचा निर्णय झाला. त्यानंतर मैदानात असलेल्या बॉक्समधून एक चेंडू निवडला आणि भारताकडे सोपवला. यानंतर शुबमन गिलचं डोकं फिरलं. पंचांकडे गेला आणि दिलेल्या चेंडूबाबत आक्षेप नोंदवला.

शुबमन गिलने तक्रार केली की दिलेला चेंडू हा 10-11 षटकं वापरलेला दिसत नाही. नियमानुसार, जेव्हा चेंडू बदलला जातो तेव्हा तसाच चेंडू दिला जातो. पण कर्णधार शुबमन गिलचं म्हणणं पंचांनी फेटाळून लावलं. त्यामुळे कर्णधार शुबमन गिल भडकला. गिलने रागाच्या भरात पंचांच्या हातून चेंडू खेचला आणि त्यांच्याशी वाद घालू लागला. त्यानंतर चेंडू पाहिल्यानंतर सिराज आणि आकाशदीपनेही प्रश्न उपस्थित केले. पण पंचांनी त्या दोघानाही दाद दिली नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.