AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs IND 2nd T20I: पावसामुळे टीम इंडियाला सुधारित आव्हान, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

Sri Lanka vs India 2nd T20i: टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी 20I सामन्यात पावसाने खोडा घातला. त्यामुळे टीम इंडियाला सुधारित धावांचं आव्हान मिळालं आहे.

SL vs IND 2nd T20I: पावसामुळे टीम इंडियाला सुधारित आव्हान, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
Rain
| Updated on: Jul 28, 2024 | 10:55 PM
Share

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात पावसाने खोडा घातला. सामन्यातील दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या बॅटिंगदरम्यान पावसाने भारतीय वेळेनुसार 9 वाजून 35 मिनिटांनी एन्ट्री घेतली. तोवर टीम इंडियाने श्रीलंकेने दिलेल्या 162 धावांचा पाठलाग करताना 0.3 ओव्हरमध्ये बिनबाद 6 धावा केल्या. त्यानंतर पावसामुळे आणि मग ओल्या खेळपट्टीमुळे एक तासाचा वेळ वाया गेला. अथक प्रयत्नानंतर अखेर ग्राउंड्स स्टाफला खेळपट्टी कोरडी करण्यात यश आलंय. मात्र बराच वेळ वाया गेला. त्यामुळे टीम इंडियाला डीएलएसनुसार सुधारित आव्हान मिळालं आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

पावसामुळे ओव्हर कट, टार्गेट किती?

पावसामुळे तब्बल 12 ओव्हरचा खेळ वाया गेला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाला डीएलएसनुसार, आता 8 ओव्हरमध्ये 78 धावांचं आव्हान मिळालं आहे. श्रीलंकेकडून एकूण 4 गोलंदाजांना प्रत्येकी 2 ओव्हर टाकता येतील. तसेच पहिले 2 ओव्हर पावरप्ले असणार आहे. टीम इंडियाने पहिल्या 3 ओव्हरमध्ये 6 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता भारताला सुधारित आव्हानानुसार 45 बॉलमध्ये आणखी 72 धावा कराव्या लागणार आहेत. सामन्याला रात्री 10 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

टीम इंडियाला 8 ओव्हरमध्ये 78 धावांचं आव्हान

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चरित असलंका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस(विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश तीक्षना, मथीशा पाथिराना आणि असिथा फर्नांडो.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि मोहम्मद सिराज.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.