AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : 2 कसोटी-3 टी 20i;टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार! कधीपासून सुरुवात?

Team India Tour Of Sri Lanka 2026 : टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यात कसोटी आणि टी 20i मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकेच्या वेळापत्रकाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

IND vs SL : 2 कसोटी-3 टी 20i;टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार! कधीपासून सुरुवात?
pant yashasvi kuldeep and sai team indiaImage Credit source: PTI
| Updated on: Jun 10, 2026 | 11:22 PM
Share

टीम इंडियाचं पुढील काही महिन्यात फार बिझी शेड्युल आहे. टीम इंडिया सातत्याने क्रिकेट सामने खेळणार आहे. टीम इंडिया मायदेशात 13 जूनपासून अफगाणिस्तान विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. तर इंग्लंड विरुद्ध भारतीय संघाला टी 20i आणि वनडे सीरिज खेळायची आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी पुढील काही महिने पर्वणी असणार आहे. अशात आता टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्नुसार, टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात डब्ल्यूटीसी साखळी अंतर्गत (WTC 2025-2027) कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. उभयसंघात एकूण 2 कसोटी सामने नियोजित आहेत. डब्ल्यूटीसी 2025-2027 या साखळीच्या हिशोबाने दोन्ही संघांसाठी ही मालिका फार महत्त्वाची ठरणार आहे.

कसोटी मालिका

क्रिकबझनुसार, पहिला कसोटी सामना हा 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. तर दुसऱ्या सामन्याची तारीख निश्चित नाहीय. रिपोर्ट्सनुसार, दुसरा कसोटी सामना 23 ऑगस्टपासून कोलंबोतील सिंहली स्पोर्ट्स क्लबमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. भारताच्या श्रीलंका दौऱ्याचं अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही.

कसोटीनंतर टी 20I मालिकेचा थरार

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात कसोटी मालिकेनंतर उभयसंघात टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 3 सामन्यांच्या टी 20I मालिकेसाठी विनंती केल्याचे संकेत बीसीसीआय सचिव देवजित सैकीया यांनी दिले होते. त्यामुळे लवकरच टी 20I मालिकेचं वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे टी 20I मालिकेची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे.

दरम्यान टीम इंडिया 2017 साली अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर गेली होती. तेव्हा भारताने विराट कोहली याच्या नेतृत्वात श्रीलंकेला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश केलं होतं. त्यामुळे आता श्रीलंका क्रिकेट टीमसमोर भारतीय संघाविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याच्या अधिकृत वेळापत्रकाची प्रतिक्षा असणार आहे.

Follow Us
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली