AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सौरव गांगुलीचा मोबाईल घरातून गेला चोरीला, आता सतावत आहे अशी भीती

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्या घरी चोरी झाली आहे. घरातून मोबाईल फोन चोरीला गेल्याने गांगुलीच्या पायाखालची जमिन सरकली. गांगुलीने याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. पण पोलिसांकडे दाद मागितली आहे.

सौरव गांगुलीचा मोबाईल घरातून गेला चोरीला, आता सतावत आहे अशी भीती
फोन चोरीला जाताच सौरव गांगुली घामाघूम, पोलिसांकडे तक्रार दाखल करत केली विनवणी
| Updated on: Feb 11, 2024 | 5:21 PM
Share

मुंबई : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि माजी कर्णधार यांच्या घरातून लाखो रुपये किमतीचा फोन चोरीला गेला आहे. कोलकात्यामधील बेहला येथील घरात चोरी झाली आहे. संबंधित प्रकार पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर उघडकीस आला आहे. गांगुलीने शनिवारी ठाकुरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सौरव गांगुलीला आता फोनपेक्षा मोबाईलमधून खासगी डाटा लीक होण्याची भीती सतावत आहे. तसेच या डेटाचा गैरवापर होण्याची भीती व्यक्त केली आहे. जेव्हा चोरीची घटना घडली तेव्हा गांगुली घरात नव्हता. पण त्यांना जेव्हा फोन घरी विसरल्याचं कळलं तेव्हा त्यांनी शोधाशोध सुरु केली. पण फोन काही हाती लागला नाही. त्यानंतर बरीच विचारपूस केल्यानंतरही सुगावा न लागल्याने अखेर पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली. आता पोलीस तपास सुरु असून लवकरच मोबाईल मिळेल अशी अपेक्षा आहे.

सौरव गांगुली याच्या घरी पेंटिंगचं काम सुरु आहे. त्यामुळे पोलिसांची संशयाची सूई आसपास फिरत आहे. तसेच या व्यतिरिक्त घरात कोण आलं आणि गेलं यासाठी सीसीटीव्ही तपासला जात आहे. गांगुलीने शनिवारी ठाकुरपूर पोलीस ठाण्यात पत्र लिहून घरातून मोबाईल चोरीला गेल्याचं सांगितलं आहे. सकाळी 11.30 वाजता शेवटा फोन पाहिला होता. त्यानंतर फोन सापडलेला नाही.

मोबाईल चोरीला जाण्यापेक्षा त्यातील डेटा लीक होण्याची भीती गांगुलीला सतावत आहे. कारण बँकेचे एक्सेस आणि महत्त्वाची माहिती त्यात आहे. हाच मोबाईल नंबर बँक अकाउंटशी लिंक आहे. तसेच दिग्गज व्यक्तींचे मोबाईल नंबर यात सेव्ह आहेत.मोबाईल शोधण्यासोबत डेटा लीक होऊ नये याची भीती सौरव गांगुलीच्या मनात घर करून बसली आहे. माहितीनुसार गांगुलीचा फोन चोरी झाला त्याची किंमत 1 लाख 60 हजार रुपये आहे.

सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायसीमध्ये क्रिकेट डायरेक्टर आहे. सौरव गांगुलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने वनडे वर्ल्डकप स्पर्धा 2003 च्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. पण ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. दुसरीकडे, अंडर 19 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करणं एक तोट्याचा करार आहे. वरिष्ठ संघ वगळता इतर कोणत्याही स्पर्धेला फारसा फायदा होत नाही.

Follow Us
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.