AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत या संघाची पहिल्यांदाच धडक, जाणून घ्या सविस्तर

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडणार आहे. वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत या संघाची पहिल्यांदाच वर्णी लागणार आहे. आतापर्यंत झालेल्या 8 पर्वात असंच कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये कुतूहूल निर्माण झालं आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत या संघाची पहिल्यांदाच धडक, जाणून घ्या सविस्तर
| Updated on: Jun 25, 2024 | 1:37 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धा 2024 स्पर्धेत मोठे उलटफेर पाहायला मिळाले. साखळी फेरीत अमेरिकेने पाकिस्तानला बाहेर केलं. तर सुपर 8 फेरीत अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा मार्ग रोखला. कधी नव्हे ती मोठी उलथापालथ या स्पर्धेत क्रीडाप्रेमींना अनुभवता आली. आता उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. भारत, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान या संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीचे सामने 27 जूनला होणार आहेत. त्यातून दोन संघ अंतिम फेरी गाठणार आहेत. मात्र पहिल्यांदाच एक संघ अंतिम फेरीची पायरी चढणार आहे. उपांत्य फेरीचे सामने होण्यापूर्वीच हे निश्चित झालं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. तुम्ही म्हणाल की, अजून उपांत्य फेरीचे सामने झाले नाहीत आणि आधीच कसं काय अंतिम फेरीत संघ पोहोचला. तर त्याचं गणित तुम्हाला मागच्या 8 पर्वाचा इतिहास पाहिला तर कळून येईल.

2007 साली टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं पहिलं पर्व पार पडलं. हा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाला आणि भारताने विजय मिळवला. 2009 च्या पर्वात पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले आणि पाकिस्तानने विजय मिळवला. 2010 च्या वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंड ऑस्ट्रेलिया यांच्यात आमनासामना झाला आणि इंग्लंडने बाजी मारली. 2012 च्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजने श्रीलंकेला पराभूत केलं आणि जेतपद मिळवलं. 2014 मध्ये श्रीलंकेने भारताला लोळवत जेतेपदावर नाव कोरलं. 2016 मध्ये पुन्हा एकदा वेस्ट इंडिजला जेतपदाचा मान मिळाला आणि इंग्लंडला पराभूत केलं. 2021 मध्ये ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड सामना झाला आणि ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलं. मागच्या पर्वात इंग्लंडने पाकिस्तानला पराभूत करत जेतेपद मिळवलं होते.

यंदाच्या पर्वात उपांत्य फेरीचे सामने असे आहेत की, एक नवखा संघ अंतिम फेरी गाठणार आहे. उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान अशी लढत होणार आहे. त्यामुळे दक्षिण अफ्रिका जिंको किंवा अफगाणिस्तान..यापैकी एक नवा संघ अंतिम फेरी गाठणार हे निश्चित आहे. त्यामुळे यंदा जेतेपदासाठी एका नव्या संघाची अंतिम फेरीत धडक असणार आहे. त्यामुळे आता अंतिम फेरी दक्षिण अफ्रिका गाठते की अफगाणिस्तान याची उत्सुकता लागून आहे.  दुसरा उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे.  अंतिम फेरीचा सामना 29 जूनला होणार आहे.

Follow Us
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल.
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक..
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक...
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती.
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ.
सरकारचाच आधी एन्काऊंटर झाला पाहिजे, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्
सरकारचाच आधी एन्काऊंटर झाला पाहिजे, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्.
महाराष्ट्राच्या तिजोरीला 32 हजार कोटींची 'गळती', धक्कादायक अहवाल समोर
महाराष्ट्राच्या तिजोरीला 32 हजार कोटींची 'गळती', धक्कादायक अहवाल समोर.
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.