AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेल्मेट आपटलं..पंचांसोबत वाद..कोचही आला मैदानात! विराट कोहलीमुळे श्रीलंकेत झाला राडा

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताची स्थिती नाजूक झाली. एकट्या जेफ्रेने निम्म्याहून अधिक संघ तंबूत पाठवला. यामुळे भारतीय संघ अडचणीत आला. पण विराट कोहलीमुळे वेगळ्याच वादाला फोडणी मिळाली. यामुळे श्रीलंकेचे खेळाडू चांगलेच तापल्याचं दिसले. नेमकं असं मैदानात काय झालं ते जाणून घ्या.

हेल्मेट आपटलं..पंचांसोबत वाद..कोचही आला मैदानात! विराट कोहलीमुळे श्रीलंकेत झाला राडा
Image Credit source: Twitter
| Updated on: Aug 04, 2024 | 9:34 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. पहिला सामना बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघाने विजयासाठी जोर लावला होता. श्रीलंकेने 50 षटकात 9 गडी गमवून 240 धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी 241 धावांचं आव्हान दिलं. रोहित शर्माने आक्रमक खेळी करून टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. पण नंतर हे आव्हान गाठताना टीम इंडियाची गाडी रुळावरून घसरली. असं असताना या सामन्यादरम्यान एका वादाला फोडणी मिळाली. टी20 मालिका निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर आता वनडे सामन्यात वाद पाहायला मिळाला. श्रीलंकेचे खेळाडू दुसऱ्या सामन्यात चांगले संतापलेले दिसले. या वादाचं कारण ठरला तो विराट कोहली..पण हा वाद काय विराट कोहलीशी नव्हता तर पंचांच्या निर्णयाशी होता. विराट कोहली तर फलंदाजी करत होता. चला जाणून घेऊयात नेमकं काय झालं ते..

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी आला. त्याच्याकडून या सामन्यात खरं तर चांगल्या खेळीची अपेक्षा होती. पण तसं काही झालं नाही. कोहली मैदानात येताच त्याने दोन चौकार मारत आपला हेतू स्पष्ट केला होता. पण दुसऱ्या चौकारानंतर भलतंच घडलं. फिरकीपटू अकिला धनंजया षटकातील शेवटचा चेंडू टाकत होता. त्या चेंडूवर एलबीडब्ल्यूसाठी अपील झाली. तेव्हा पंचांनी त्याला बाद असल्याचं घोषित केलं. पण विराट कोहलीने रिव्ह्यू घेतला आणि वादाला सुरुवात झाली.

रिप्लेत चेंडू विराट कोहलीच्या बॅटच्या अगदी जवळ होता. तेव्हाच स्नीकोमीटरमध्ये आवाजाची नोंद झाली. त्यामुळे बॅटला लागून चेंडू पॅडला लागल्याचं त्यावरून सिद्ध होत होतं. त्यामुळे तिसऱ्या पंचांकडे निर्णय बदलण्याशिवाय काही पर्याय नव्हता. हा निर्णय येताच श्रीलंकेचे खेळाडू भडकले. इतकंच काय तर पंचांशी वाद देखील घातला. विकेटकीपर कुसल मेंडिसने हेल्मेट काढून जमिनीवर आपटलं. कर्णधार चरिथ असलंकाही पंचांशी निर्णयावरून वाद घालू लागला. श्रीलंकेचा कोच सनथ जयसूर्या ड्रेसिंग रुममधून मैदानात आला आणि बाउंड्रीवरील चौथ्या पंचांना प्रश्न विचारू लागला. यावेळी श्रीलंकन खेळाडू कोहलीला काहीतरी विचारू लागले, पण कोहलीन फक्त हसला आणि काहीच बोलला नाही. दरम्यान, विराट कोहली काही खास करू शकला नाही. 19 चेंडूत 14 धावा करून बाद झाला.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...