AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2025 स्पर्धेत नव्या शत्रूची एन्ट्री, या संघाला बसणार मोठा फटका; कसं काय ते जाणून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 17 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. असं असताना एका संघाची विचित्र स्थितीमुळे धाकधूक वाढली आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेत नव्या शत्रूची एन्ट्री, या संघाला बसणार मोठा फटका; कसं काय ते जाणून घ्या
आरसीबी विरुद्ध केकेआरImage Credit source: PTI
| Updated on: May 16, 2025 | 4:08 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी तीन संघांचा प्लेऑफच्या शर्यतीतून पत्ता कट झाला आहे. चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट झाले आहेत. अजूनही उर्वरित सात संघात प्लेऑफची चुरस आहे. त्यामुळे 17 मे रोजी होणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. या दोन्ही संघांना या सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. पण या सामन्यात एक विचित्र उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही संघांना मोठा फटका बसू शकतो. एका संघाचं तर प्लेऑफचं स्वप्न यामुळे भंगणार आहे. नेमकं काय होणार आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं उत्तर असं आहे की, 17 मे रोजी बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने या सामन्यावेळी 65 टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. जर सामन्यावेळी पाऊस पडला तर दोन्ही संघांना मोठा फटका बसू शकतो.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं गणित

पावसामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स हा सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. यामुळे आरसीबीचं गणित ताणलं जाईल. कारण 17 गुण झाले तर प्लेऑफमधील स्थान काही पक्कं होणार आहे. त्यामुळे उर्वरित दोन पैकी एक सामना जिंकणं भाग पडेल. असं केल्यास टॉप 2 मधील स्थान पक्कं होईल. आरसीबी सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर गुजरातचा संघ पहिल्या स्थानावर आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचं गणित

पावसामुळे सामना रद्द झाला तर कोलकात्याच्या प्लेऑफच्या आशा मावळतील. कारण कोलकात्याने 12 सामन्यापैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे एक गुण मिळला होता. कोलकात्याचे 11 गुण असून गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे टॉप 4 मध्ये स्थान मिळवायचं तर उर्वरित दोन्ही सामने जिंकणं भाग आहे. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द झाला तर एक गुण मिळेल आणि 12 गुण होतील. शेवटचा सामना जिंकला तरी 14 गुण होतील त्यामुळे स्पर्धेतील आशा संपुष्टात येतील. कारण टॉप 3 संघांचे गुण 15 पेक्षा जास्त आहे. मुंबई इंडियन्सचे 14 गुण आहेत आणि नेट रनरेट चांगला आहे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.