AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2025 स्पर्धेत नव्या शत्रूची एन्ट्री, या संघाला बसणार मोठा फटका; कसं काय ते जाणून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 17 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. असं असताना एका संघाची विचित्र स्थितीमुळे धाकधूक वाढली आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेत नव्या शत्रूची एन्ट्री, या संघाला बसणार मोठा फटका; कसं काय ते जाणून घ्या
आरसीबी विरुद्ध केकेआरImage Credit source: PTI
| Updated on: May 16, 2025 | 4:08 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी तीन संघांचा प्लेऑफच्या शर्यतीतून पत्ता कट झाला आहे. चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट झाले आहेत. अजूनही उर्वरित सात संघात प्लेऑफची चुरस आहे. त्यामुळे 17 मे रोजी होणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. या दोन्ही संघांना या सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. पण या सामन्यात एक विचित्र उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही संघांना मोठा फटका बसू शकतो. एका संघाचं तर प्लेऑफचं स्वप्न यामुळे भंगणार आहे. नेमकं काय होणार आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं उत्तर असं आहे की, 17 मे रोजी बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने या सामन्यावेळी 65 टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. जर सामन्यावेळी पाऊस पडला तर दोन्ही संघांना मोठा फटका बसू शकतो.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं गणित

पावसामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स हा सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. यामुळे आरसीबीचं गणित ताणलं जाईल. कारण 17 गुण झाले तर प्लेऑफमधील स्थान काही पक्कं होणार आहे. त्यामुळे उर्वरित दोन पैकी एक सामना जिंकणं भाग पडेल. असं केल्यास टॉप 2 मधील स्थान पक्कं होईल. आरसीबी सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर गुजरातचा संघ पहिल्या स्थानावर आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचं गणित

पावसामुळे सामना रद्द झाला तर कोलकात्याच्या प्लेऑफच्या आशा मावळतील. कारण कोलकात्याने 12 सामन्यापैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे एक गुण मिळला होता. कोलकात्याचे 11 गुण असून गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे टॉप 4 मध्ये स्थान मिळवायचं तर उर्वरित दोन्ही सामने जिंकणं भाग आहे. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द झाला तर एक गुण मिळेल आणि 12 गुण होतील. शेवटचा सामना जिंकला तरी 14 गुण होतील त्यामुळे स्पर्धेतील आशा संपुष्टात येतील. कारण टॉप 3 संघांचे गुण 15 पेक्षा जास्त आहे. मुंबई इंडियन्सचे 14 गुण आहेत आणि नेट रनरेट चांगला आहे.

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.