AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मग अझरुद्दीनने सत्य काय ते सांगावं’, सुनील गावस्करांचं रोहित-विराट वादावर भाष्य

"या प्रकरणात लोकांनी लगेच निष्कर्षापर्यंत पोहोचू नये. कोहली आणि रोहितचे संबंध कसे होते? या बद्दल अझरुद्दीनकडे काही आतली माहिती असेल, तर त्याने संपूर्ण सत्य काय आहे ते सर्वांना सांगावं" असं गावस्कर यांनी म्हटलं आहे.

'मग अझरुद्दीनने सत्य काय ते सांगावं', सुनील गावस्करांचं रोहित-विराट वादावर भाष्य
Sunil Gavaskar
| Edited By: Anish Bendre | Updated on: Dec 15, 2021 | 1:13 PM
Share

मुंबई: रोहित शर्मा (Rohit sharma) आणि विराट कोहली (Virat kohli) यांच्यामधील कथित वादावर भारताचे प्रसिद्ध क्रिकेटपटू लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी भाष्य केलं आहे. विराट आणि रोहितमध्ये सुरु असलेल्या कथित वादामध्ये तुम्ही कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नका, असं सुनील गावस्कर यांनी क्रिकेट चाहते आणि पंडितांना आवाहन केलं आहे. पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतून (South Africa oneday series) विराट कोहलीला ब्रेक हवा आहे. त्याने त्या बद्दल बीसीसीआयला कळवलं आहे. ही बातमी बाहेर आल्यापासूनच दोघांमधील वादांच्या चर्चांना बळकटी मिळाली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी कोहलीच्या ब्रेक मागण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “ब्रेक घेण्यात काहीच चुकीचं नाही, पण वेळ योग्य असली पाहिजे” असं मोहम्मद अझरुद्दीन यांनी म्हटलं आहे. अझरने त्याच्या टि्वटमधून भारताच्या या दोन खेळाडूंमध्ये मतभेद असल्याचे संकेत दिलेत. पण गावस्करांना हे मत पटलेलं नाही.

गावस्करांना नाही पटलं अझरुद्दीनचं मत

“या प्रकरणात लोकांनी लगेच निष्कर्षापर्यंत पोहोचू नये. कोहली आणि रोहितचे संबंध कसे होते? या बद्दल अझरुद्दीनकडे काही आतली माहिती असेल, तर त्याने संपूर्ण सत्य काय आहे ते सर्वांना सांगावं” असं गावस्कर यांनी म्हटलं आहे. “दोन्ही खेळाडू जो पर्यंत काही बोलत नाहीत, तो पर्यंत आपण निष्कर्षावर येऊ नये. अझरुद्दीन काही तरी बोलला आहे. त्याच्याकडे काय घडलं, त्याची माहिती असेल, तर त्याने समोर येऊन सांगावं” असं गावस्कर म्हणाले.

मागच्या आठवड्यात भारताच्या वनडे संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं. त्यानंतर विराट कोहलीने आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून ब्रेक मागितला. तेव्हापासून भारताच्या या दोन्ही आघाडीच्या खेळाडूंमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा आहेत. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, रोहितची वनडे कर्णधारपदी निवड झाल्यामुळे विराट कोहली नाराज असल्याची निव्वळ अफवा आहे. असं काही नाहीय.

संबंधित बातम्या: ‘खेळापेक्षा कोणी मोठा नाही’, क्रीडा मंत्री ठाकूर यांचं विराट-रोहित वादावर स्पष्ट मत India vs South Africa: BCCI विराटची समजूत काढण्यात यशस्वी ठरणार? कोहली निर्णय बदलेल? विराट कोहली आज मौन सोडणार, वादग्रस्त प्रश्नांवर काय उत्तर देणार?

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...