AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs South Africa: BCCI विराटची समजूत काढण्यात यशस्वी ठरणार? कोहली निर्णय बदलेल?

भारताचे हे दोन्ही प्रमुख खेळाडू महत्त्वांच्या मालिकांमध्ये खेळत नसल्याने वेगळाच अर्थ काढला जात आहे. काही वेळेला फक्त योग्य गोष्टी करणं आवश्यक नसतं, तर योग्य गोष्टी करतोय हे दिसलं पाहिजे.

India vs South Africa: BCCI विराटची समजूत काढण्यात यशस्वी ठरणार? कोहली निर्णय बदलेल?
Rohit Sharma Virat Kohli
| Edited By: Anish Bendre | Updated on: Dec 15, 2021 | 12:01 PM
Share

नवी दिल्ली: नव्या वर्षात जानेवारीमध्ये कसोटी मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही विराट कोहलीने (Virat kohli) खेळावे, यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) प्रयत्नशील आहे. विराटने बीसीसीआयकडे वनडे सीरीजमधून ब्रेक मागितला आहे. आधीच रोहित शर्मा (Rohit sharma) कसोटी मालिकेत खेळणार नाहीय. त्यात विराटने ब्रेक मागितल्याची बातमी समोर आल्याने मीडिया आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरु आहेत.

विराटने ब्रेक कधी मागितला?

विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीजमधून ब्रेक मागितला हे खरं आहे. पण वनडेच्या कर्णधारपदी रोहितची निवड होण्याआधी विराटने ब्रेक मागितला होता, असं बीसीसीआयमधील सूत्रांच म्हणणं आहे. टीम इंडियामध्ये कुठलेही मतभेद नाहीत. सर्वकाही आलबेल आहे हा स्पष्ट संदेश बाहेर गेला पाहिजे, तेच सध्याच्या घडीला बीसीसीआयसमोरचं मुख्य आव्हान आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

योग्य गोष्टी करतोय हे दिसलं पाहिजे

रोहितने दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे, तर विराटला कौटुंबिक कारणांसाठी ब्रेक हवा आहे. भारताचे हे दोन्ही प्रमुख खेळाडू महत्त्वांच्या मालिकांमध्ये खेळत नसल्याने वेगळाच अर्थ काढला जात आहे. काही वेळेला फक्त योग्य गोष्टी करणं आवश्यक नसतं, तर योग्य गोष्टी करतोय हे दिसलं पाहिजे, असं या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्राने सांगितले.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी कोहली आज पत्रकार परिषद घेणार आहे. त्यावेळी या विषयावर पडदा पडू शकतो. कोहलीला व्यक्तीगत कारणांसाठी ब्रेक हवा आहे. कर्णधार बदलल्यामुळे तो नाराज आहे, या चर्चा म्हणजे निव्वळ अफवा आहेत, असे बोर्डातील सूत्रांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या: INDvSA: रोहित दुखापतग्रस्त असल्याने सलामीच्या जागेसाठी ‘या’ तिघांमध्ये चुरस ‘आव्हानांचा विचार केला, तर…’, टेस्ट टीममध्ये निवड झाल्यानंतर प्रियांक म्हणाला… Kuldeep Yadav : टीम इंडियाचा चायनामन कुलदीप यादव निघालेला आत्महत्या करायला? नेमकं कारण काय?

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक