AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup : भारतानं एकही धाव केली नसती तरीही सामना जिंकला असता कारण…, भाजप नेत्याची पोस्ट व्हायरल

आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताचा ऐतिहासिक विजय झाला आहे. भारतानं सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्याची पोस्ट चांगलीच चर्चेमध्ये आली आहे.

T20 World Cup : भारतानं एकही धाव केली नसती तरीही सामना जिंकला असता कारण..., भाजप नेत्याची पोस्ट व्हायरल
T20 World CupImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 09, 2026 | 3:10 PM
Share

आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताचा ऐतिहासिक विजय झाला आहे. भारतानं सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण देशभरात उत्साहाच वातावरण आहे. भारत न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता बनला, त्यानंतर आता भारताच्या या विजयावर देशभरातून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. यातील काही प्रतिक्रियांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. याचदरम्यान लखनऊ उत्तरचे भाजपा आमदार डॉ. नीरज बोरा यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. भारतानं न्यूझीलंडवर मोठा विजय मिळवला, त्यानंतर बोरा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की, ‘मैदानात आदरणीय अमित शाहाजी होते, त्यामुळे भारतानं एकही धाव काढली नसतील तरी भारत आरामात जिंकू शकला असता, 255 चा धावफलक तर आउट ऑफ रीच होता’.

दरम्यान बोरा यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चचा विषय ठरली आहे. बोरा यांच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स येत आहेत. अनेकांनी तर या पोस्टवरून बोरा यांची चांगलीच फिरकी घेतली आहे, तर काही जणांनी बोरा यांच्या या पोस्टला राजकारणाशी जोडलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटलं आहे की, तुम्ही बरोबर बोलत आहात, अमित शाह यांनी आक्रमक फलंदाजी केली, त्यामुळेच टीम इंडिया हा वर्ल्ड कप जिंकू शकली. तर इतरही काही युजर्सनी यावर आपल्या खास शैलीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.

भारत सलग दुसऱ्यांदा विजेता

भारतानं रविवारी अहमदाबादच्या मैदानावर खेळताना इतिहास रचला आहे, भारत सलग दुसऱ्यांदा आणि टी 20 वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये तिसऱ्यांदा विश्वविजेता बनला आहे. भारतानं रविवारच्या सामन्यात न्यूझिलंडचा 96 धावांनी पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला, भारतानं प्रथम फलंदाजी करातना न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात भारतानं विस ओव्हरमध्ये तब्बल 256 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडवर आधीच धावांचं दडपण आलं. भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेली न्यूझीलंडची टीम अवघ्या 159 धावात सर्वबाद झाली आणि टीम इंडियानं तब्बल 96 धावांनी हा सामना आपल्या खिशात घातला. यापूर्वी 2024 मध्ये देखील भारतानेच वर्ल्ड कप जिंकला होता.

Follow Us
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार