AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Press Conference : पहिल्या कसोटीआधी रोहित शर्माने पत्रकार परिषदेत मन मोकळं केलं, म्हणाला…

Rohit Sharma Press Conference : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने पहिल्या कसोटीआधी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये रोहितने वर्ल्ड कपमधील पराभवाबाबतस दिलखुलासपणे गप्पा मारल्या. बोलता बोलता मन मोकळं करून टाकलं.

Rohit Press Conference : पहिल्या कसोटीआधी रोहित शर्माने पत्रकार परिषदेत मन मोकळं केलं, म्हणाला...
| Updated on: Dec 25, 2023 | 5:44 PM
Share

मुंबई : साऊथ आफ्रिका आणि टीम इंडियामधील कसोटी मालिका पार पडणार आहे. पहिला कसोटी सामना उद्यापासून सुरू होणार असून 26 डिसेंबरला भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामना सुरू होणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सर्व मुद्द्यांवर दिलखुलासपणे उत्तरे दिलीत. वर्ल्ड कप फायनलमध्ये झालेला पराभव, मोहम्मद शमी या मालिकेला मुकला आहे.

रोहित शर्मा काय म्हणाला?

वर्ल्ड कपमधील पराभवानंतर सर्व संघ निराश झाला होता. मात्र हा पराभव विसरत आता पुढे जावं लागणार आहे. वर्ल्ड कपसाठी खूप मेहनत केली. 10 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती फायनलमध्येही बऱ्याच गोष्टी चांगल्या झाल्या पण काय चुकलं काय नाही याबाबत काय बोलायचं, सर्वांना झालेला पराभव विसरत पुढे जावं लागणार असल्याचं रोहित शर्माने म्हटलं आहे.

देशाला गौरव मिळवून द्यायचे आहे, आम्ही दक्षिण आफ्रिकेत एकही मालिका जिंकलेली नाही. आफ्रिकेविरूद्धची कसोटी मालिका जिंकल्यावर वर्ल्ड कप पराभवाच्या दु:खावर मलमा लावल्यासारखं असेल असं  मला वाटत नाही. वर्ल्ड कप वर्ल्ड कप असतो. देशासाठी गौरव मिळवून देणारे खेळाडू आपल्याकडे आहेत, असं रोहित म्हणाला. रोहितच्या या उत्तरावरून दिसून आलं की पराभव सहजासहजी तो विसरणार नाही.

क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेट हा सर्वात अवघड फॉरमॅट आहे. मी सर्व खेळाडूंच्या डोळ्यात उत्साह पाहायला आहे, त्यांनाही कसोटी क्रिकेट खेळायचं आहे. खेळडूंनी जास्तीत जास्त कसोटी क्रिकेट खेळावं अशी माझी इच्छा आहे. या फॉरमॅटमध्ये  खेळाडूंचं कौशल्य दिसून येत असल्याचं रोहित शर्माने सांगितलं.

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (VC). ), प्रसिध कृष्णा आणि केएस भरत (WK).

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.