AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026: टीम इंडियाने नेदरलँडला पराभूत केलं पण 7 गोलंदाज वापरले, सूर्यकुमार म्हणाला..

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीच्या चौथ्या सामन्यात भारताने नेदरलँडचा 17 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताने 199 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण नेदरलँडला 176 धावांपर्यंत मजल मारता आली.

T20 WC 2026: टीम इंडियाने नेदरलँडला पराभूत केलं पण 7 गोलंदाज वापरले, सूर्यकुमार म्हणाला..
T20 WC 2026: टीम इंडियाने नेदरलँडला पराभूत केलं पण 7 गोलंदाज वापरले, सूर्यकुमार म्हणाला..Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 18, 2026 | 11:08 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतील चारही सामने भारताने आपल्या झोळीत टाकले. या स्पर्धेत भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांची कसोटी लागली. पण भारताने विजयी घोडदौड कायम ठेवली. भारताने पहिल्या सामन्यात अमेरिकेला पराभूत केलं. या सामन्यात भारतीय फलंदाजीचा कस लागला होता. पण भारताने बाजी मारली. नामिबियाविरूद्धचा दुसरा सामना भारताने सहज जिंकला. तर पाकिस्तानला कोलंबोत जाऊन पराभवाची धूळ चारली. या विजयासह भारताने सुपर 8 फेरीत जागा पक्की केली होती. त्यामुळे नेदरलँडविरुद्धचा सामना औपचारिक होता. पण नेदरलँडने हा विजय काही सहज दिला नाही. शिवम दुबेची बॅट चालली म्हणून 193 धावांपर्यंत मजल मारता आली. नाही तर गणित खूपच कठीण झालं असतं. भारताने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना नेदरलँडने 176 धावांपर्यंत मजल मारली आणि सामना 17 धावांनी गमावला. या सामन्यात भारताने एकूण 7 गोलंदाज वापरले. इतके गोलंदाज वापरल्याने समालोचकांनही आश्चर्य व्यक्त केलं. हा काही सराव सामना नाही असंही अनेकांनी मत नोंदवलं.  यावर सूर्यकुमार यादवने आपलं मत व्यक्त केलं.

सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘कधीकधी गोलंदाजीचे पर्याय असणे एक चांगले डोकेदुखी असते. माझ्याकडे मध्यभागी किती गोलंदाज आहेत? अभिषेक शर्मा आहे, नंतर हार्दिक, दुबे. तर माझ्याकडे मध्यभागी बरेच पर्याय आहेत. ते काहीही असो, दिलेल्या दिवशी, विकेटची मागणी काहीही असो, मला वाटते की ते काही षटकांमध्ये मदत करू शकतात.’ अर्शदीप सिंगने 3, जसप्रीत बुमराहने 3, वॉशिंग्टन सुंदरने 4, वरूण चक्रवर्तीने 3, हार्दिक पांड्याने 3, अभिषेक शर्माने 1 आणि शिवम दुबेने 3 षटकं टाकली.

फलंदाजाच्या फॉर्मावर सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘ज्या पद्धतीने पुढे जात आहेत त्यावर मी खूप आनंदी आहे. योगदान जवळजवळ प्रत्येक फलंदाजाकडून येत आहे. मला तेच हवे आहे, त्या छोट्या, छोट्या भागीदारी. जेव्हा खेळ थोडासा कठीण असतो, तेव्हा एक किंवा दोन फलंदाजांचा दिवस चांगला जाऊ शकतो, परंतु नंतर चांगली धावसंख्या गाठण्यासाठी आपल्याला सर्व फलंदाजांच्या पाठिंब्याची आवश्यकता असते.’

सूर्यकुमार यादवने काही क्षेत्रात काम करण्याची गरज असल्याचं सांगितलं. ‘तुम्ही असे म्हणू शकत नाही की आम्ही जवळजवळ सर्व बॉक्स टिक केले आहेत, पण तुम्ही जिंकलात तरी तुम्ही त्यातून काहीतरी शिकता. आणि आम्ही काही क्षेत्रे शिकलो आहोत. आम्ही रूममध्ये परत जाऊ, उद्या एक दिवस सुट्टी घेऊ आणि त्यावर गप्पा मारू.’, असं सूर्यकुमार म्हणाला.

Follow Us
तिसरा श्रावणी सोमवार अन् त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तीचा सागर!
Nashik | तिसरा श्रावणी सोमवार अन् त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तीचा सागर! मध्यरात्रीपासून भाविकांची तुफान गर्दी
मुंबई महापालिकेवर वर्चस्वासाठी शिंदे सेनेचा मास्टरप्लॅन! ठाकरे गटाला..
Shivsena | मुंबई महापालिकेवर वर्चस्वासाठी शिंदे सेनेचा मास्टरप्लॅन! मिशन टायगरमधून ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी सुरू
जरांगेंनंतर हाकेंचा मुंबईकडे एल्गार! सरकारसमोर नवं आव्हान काय?
tv9 Marathi Special Report | जरांगेंनंतर हाकेंचा मुंबईकडे एल्गार! 1 सप्टेंबरला आझाद मैदानात ओबीसींचा महासंग्राम; सरकारसमोर नवं आव्हान काय?
जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस; सरकारकडून आज चर्चा, कोण कोण जाणार?
Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस; सरकारकडून आज मोठी चर्चा, कोण कोण जाणार?
श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
'पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले'-सदाभाऊ खोत
Sadabhau Khot : 'पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले', मंत्रीपद न मिळाल्याने सदाभाऊ खोतांकडून खदखद व्यक्त
24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
Uday Samant On Manoj Jarange Protest : 24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
प्रसंगावधान राखत बस कर्मचाऱ्याने वाचवले वृद्ध प्रवाशाचे प्राण
केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले
महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये मेडलवरून वाद; पालकांकडून अधिकाऱ्यांना घेराव
ठाणे मॅरेथॉन: विजेत्यांना मेडल न मिळाल्याने पालकांचा गोंधळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारांचाच -सुप्रिया सुळे
Supriya Sule : चुकीच्या पद्धतीने काढून घेतलेला राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांना परत करा: सुप्रिया सुळे