AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : सुपर 4 फेरीत टीम इंडियासमोर असा पेच! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी चाहत्यांची धाकधूक

आशिया कप 2025 स्पर्धेत भारतीय संघाने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकून भारताने सुपर 4 फेरीत पाऊल ठेवलं आहे. आता भारताला सुपर 4 फेरीत एकूण 3 सामने खेळायचे आहेत. पण चाहत्यांच्या मनात वेगळीत भीती घर करून आहे.

Asia Cup 2025 : सुपर 4 फेरीत टीम इंडियासमोर असा पेच! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी चाहत्यांची धाकधूक
सुपर 4 फेरीत टीम इंडियासमोर असा पेच! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी चाहत्यांची धाकधूकImage Credit source: PTI
| Updated on: Sep 20, 2025 | 3:25 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेचं साखळी फेरीचे सामने संपले असून 21 सप्टेंबरपासून सुपर 4 फेरीला सुरुवात होणार आहे. सुपर 4 फेरीत अ गटातून भारत, पाकिस्तान आणि ब गटातून श्रीलंका, बांग्लादेश यांनी जागा मिळवली आहे. आता या चार संघात टॉप 2 स्थानांसाठी लढत होणार आहे. प्रत्येक संघ एकूण तीन सामने खेळणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत 21 सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर श्रीलंका आणि बांगलादेशशी लढत होईल. पण भारताचा सुपर 4 फेरीतील टी20 आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड पाहिला तर चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. कारण भारताचा आशिया कप सुपर 4 फेरीतील इतिहास काही खास राहिला नाही. यापूर्वी आशिया कप टी20 फॉर्मेटमध्ये दोनदा खेळला गेला. यात एकदा सुपर 4 फेरी खेळवली गेली.

2022 मध्ये पहिल्यांदा खेळवल्या गेलेल्या या फॉर्मेटमध्ये भारताला सुपर 4 फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. तेव्हा भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे संघ सुपर 4 फेरीत होते. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी झाला होता. तेव्हा भारताने 20 षटकात 7 गडी गमवून 181 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पाकिस्तानने 19.5 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने भारताला मात दिली होती. तेव्हा भारताने 173 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान श्रीलंकेने 4 गडी गमवून 19.5 षटकात पूर्ण केलं होते. अफगाणिस्तानविरुद्धचा तिसरा सामना भारताने जिंकला होता. तेव्हा 212 धावांचं आव्हान दिलं होतं. तसेच अफगाणिस्तानला 111 धावांवर रोखलं होतं.

आशिया कप 2025 स्पर्धेत पुन्हा एकदा सुपर 4 फेरीत भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशशी सामना करायचा आहे. भारताला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवायचं असेल तर पहिल्याच सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. अन्यथा भारताचा प्रवास खडतर होऊ शकतो. दरम्यान, टी20 फॉर्मेटमध्ये भारताने 2024 वर्ल्डकपनंतर एकूण 22 सामने खेळले आहेत. त्यापैकी 19 सामने जिंकले आहेत. सध्या टीम इंडिया फॉर्मात आहे. त्यामुळे सुपर 4 फेरीत भारताचं पारडं जड दिसत आहे. सूर्यकुमार यादवच्या पुढे कशी कामगिरी होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?.
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर.
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?.
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे.
'भोंदूबाबाचा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश...,' संजय राऊत यांचा आरोप
'भोंदूबाबाचा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश...,' संजय राऊत यांचा आरोप.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी.
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार.
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका.