AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : सुपर 4 फेरीत टीम इंडियासमोर असा पेच! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी चाहत्यांची धाकधूक

आशिया कप 2025 स्पर्धेत भारतीय संघाने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकून भारताने सुपर 4 फेरीत पाऊल ठेवलं आहे. आता भारताला सुपर 4 फेरीत एकूण 3 सामने खेळायचे आहेत. पण चाहत्यांच्या मनात वेगळीत भीती घर करून आहे.

Asia Cup 2025 : सुपर 4 फेरीत टीम इंडियासमोर असा पेच! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी चाहत्यांची धाकधूक
सुपर 4 फेरीत टीम इंडियासमोर असा पेच! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी चाहत्यांची धाकधूकImage Credit source: PTI
| Updated on: Sep 20, 2025 | 3:25 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेचं साखळी फेरीचे सामने संपले असून 21 सप्टेंबरपासून सुपर 4 फेरीला सुरुवात होणार आहे. सुपर 4 फेरीत अ गटातून भारत, पाकिस्तान आणि ब गटातून श्रीलंका, बांग्लादेश यांनी जागा मिळवली आहे. आता या चार संघात टॉप 2 स्थानांसाठी लढत होणार आहे. प्रत्येक संघ एकूण तीन सामने खेळणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत 21 सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर श्रीलंका आणि बांगलादेशशी लढत होईल. पण भारताचा सुपर 4 फेरीतील टी20 आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड पाहिला तर चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. कारण भारताचा आशिया कप सुपर 4 फेरीतील इतिहास काही खास राहिला नाही. यापूर्वी आशिया कप टी20 फॉर्मेटमध्ये दोनदा खेळला गेला. यात एकदा सुपर 4 फेरी खेळवली गेली.

2022 मध्ये पहिल्यांदा खेळवल्या गेलेल्या या फॉर्मेटमध्ये भारताला सुपर 4 फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. तेव्हा भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे संघ सुपर 4 फेरीत होते. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी झाला होता. तेव्हा भारताने 20 षटकात 7 गडी गमवून 181 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पाकिस्तानने 19.5 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने भारताला मात दिली होती. तेव्हा भारताने 173 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान श्रीलंकेने 4 गडी गमवून 19.5 षटकात पूर्ण केलं होते. अफगाणिस्तानविरुद्धचा तिसरा सामना भारताने जिंकला होता. तेव्हा 212 धावांचं आव्हान दिलं होतं. तसेच अफगाणिस्तानला 111 धावांवर रोखलं होतं.

आशिया कप 2025 स्पर्धेत पुन्हा एकदा सुपर 4 फेरीत भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशशी सामना करायचा आहे. भारताला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवायचं असेल तर पहिल्याच सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. अन्यथा भारताचा प्रवास खडतर होऊ शकतो. दरम्यान, टी20 फॉर्मेटमध्ये भारताने 2024 वर्ल्डकपनंतर एकूण 22 सामने खेळले आहेत. त्यापैकी 19 सामने जिंकले आहेत. सध्या टीम इंडिया फॉर्मात आहे. त्यामुळे सुपर 4 फेरीत भारताचं पारडं जड दिसत आहे. सूर्यकुमार यादवच्या पुढे कशी कामगिरी होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान