AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी काय तयारी? ओमानने कडवी झुंज दिल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला…

आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यांचा भारत ओमान सामन्यानंतर शेवट झाला. या सामन्यात ओमानने कडवी झुंज दिली. भारताने या सामन्यात २१ धावांनी विजय मिळवला. आता भारताचा सुपर ४ मध्ये पाकिस्तानशी सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवने मनोगत व्यक्त केलं.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी काय तयारी? ओमानने कडवी झुंज दिल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला...
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी काय तयारी? ओमानने कडवी झुंज दिल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला...Image Credit source: Twitter
| Updated on: Sep 20, 2025 | 1:34 AM
Share

आशिया कप २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात भारत आणि ओमान हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताचं पारडं जड होतं. पण ओमानने भारतीय संघाला विजयासाठी चांगलंच झुंजवलं.एकंदरीत भारताने ओमानविरुद्धचा सामना जिंकला असला तरी ओमानने क्रीडारसिकांची मनं जिंकली आहेत. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने प्रथम फलंदाजी करताना बरेच प्रयोग केले. या प्रयोगाचा इतका भडिमार झाला की कर्णधार सूर्यकुमार सर्वात शेवटी राहिला. त्यामुळे या रणनीतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. इतकंच काय भारतीय फलंदाजांची संथ फलंदाजीवर टीका होत आहे. असं सर्व असातना कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्व प्रश्नांची उत्तरं दिलं. सुपर ४ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने काय रणनिती आखली याबाबतही कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितलं.

सूर्यकुमार यादवला पहिला प्रश्न त्याच्या फलंदाजीच्या क्रमाबाबत विचारला. तेव्हा त्याने हसत सांगितलं की, पुढच्या सामन्यापासून वर खेळण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. सूर्यकुमार यादवने त्यानंतर ओमान क्रिकेट संघाचं कौतुक केलं. ‘एकूणच प्रभावी, मला वाटते की ओमानने अविश्वसनीय क्रिकेट खेळले. त्यांचे प्रशिक्षक सुलू सर (सुलक्षण कुलकर्णी) यांच्याकडून मला माहित होते की तिथे खडूसपणा असेल. ते आश्चर्यकारक होते, त्यांना फलंदाजी करताना पाहणे खरोखरच आवडले.’, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

सूर्यकुमार यादवला अर्शदीप सिंग आणि हर्षित राणाच्या गोलंदाजीबाबत विचारलं. तेव्हा सूर्यकुमार म्हणाला की, जेव्हा तुम्ही बसलेले असता आणि अचानक तुम्ही बाहेर येऊन खेळता तेव्हा ते थोडे कठीण असते.येथे खूप दमट वातावरण आहे. इतकंच काय तर हार्दिक पांड्याबाबतही सूर्यकुमार यादवने मत व्यक्त केलं. ‘ कसा बाद झाला हे दुर्दैवी आहे पण तुम्ही त्याला खेळापासून दूर ठेवू शकत नाही. त्याने चांगली गोलंदाजी केली.’ या स्पर्धेतील सुपर ४ मधील हायव्होल्टेज सामना रविवारी होत आहे. भारत पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येत आहेत. याबाबत सूर्यकुमार विचारलं तेव्हा सांगितलं की, सुपर फोरसाठी सर्व काही तयार आहे.

Follow Us
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?.
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर.
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?.
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे.
'भोंदूबाबाचा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश...,' संजय राऊत यांचा आरोप
'भोंदूबाबाचा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश...,' संजय राऊत यांचा आरोप.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी.
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार.