AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारण की…

भारत दक्षिण अफ्रिका यांच्यात 14 नोव्हेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. पण या मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. दक्षिण अफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूने कमबॅक केलं आहे.

IND vs SA: कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारण की...
IND vs SA: कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारण की...Image Credit source: PTI
| Updated on: Nov 10, 2025 | 3:17 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या भारतासाठी दक्षिण अफ्रिका कसोटी मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या मालिकेत दक्षिण अफ्रिकेला 2-0 ने मात दिली तर अंतिम फेरीचं समीकरण सोपं होईल. अन्यथा मागच्या वेळेसारखं सर्व काही फिस्कटून जाईल. ही मालिका भारतात होत असल्याने भारतीय संघाला सोपं जाईल, असं म्हंटलं जात आहे. पण ही मालिका जिंकणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण वेस्ट इंडिजच्या तुलनेत दक्षिण अफ्रिकेचं मोठं आणि तगडं आव्हान असणार आहे. कारण दक्षिण अफ्रिकन संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेला आहे. त्यात पाकिस्तानातील कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली. आता भारताविरुद्ध 14 नोव्हेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. पण या मालिकेपूर्वीच दक्षिण अफ्रिकेकडून धोक्याची घंटा मिळाली आहे. कारण दक्षिण अफ्रिकन ए संघाने भारत ए संघाला पराभवाची धूळ चारली आणि क्रीडाप्रेमींना विचार करण्यास भाग पाडलं.

दक्षिण अफ्रिका ए आणि भारत ए संघात अनौपचारिक कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेसमोवर विजयासाठी 417 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 5 गडी गमवून पूर्ण केलं. दक्षिण अफ्रिका ए संघाने भारताच्या मुख्य संघात निवड झालेल्या गोलंदाजासमोर हे आव्हान गाठलं. त्यामुळे भारतीय गोलंदाजांची पकड सैल झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यात दक्षिण अफ्रिका ए संघाच्या विजयात टेम्बा बावुमाने मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या सामन्यात टेम्बा बावुमा दक्षिण अफ्रिका ए संघात खेळला. पहिल्या डावात गोल्डन डकवर गेला. पण दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांना पाणी पाजलं. त्याने 101 चेंडूंचा सामना 59 धावा काढल्या. दुखापतीनंतर पुनरागमन करत टेम्बा बावुमाने ही अर्धशतकी खेळी केली.

टेम्बा बावुमाने मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि कुलदीप यादव यांचा सामना करत धावा काढल्या. हे तिघंही भारतीय संघात आहेत. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी टेम्बा बावुमाचा चांगलाच सराव झाला असावा. पण बावुमाचा भारताविरुद्ध काही खास रेकॉर्ड नाही. भारताविरुद्ध फक्त चार कसोटी सामने खेळला आहे. यात एकूण 152 धावा केल्या आहेत. पण एकही अर्धशतक नाही. पण आता बावुमा चांगल्या फॉर्मात आहे. मागच्या दीड वर्षात त्याने चांगल्या धावा काढल्या आहेत. त्याने 7 कसोटी सामन्यांच्या 13 डावात 59 च्या सरासरीने 711 धावा केल्या आहे. त्यामुळे कसोटी मालिकेपूर्वी दक्षिण अफ्रिकेच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. भारतीय गोलंदाजांना खूपच घाम गाळावा लागणार आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक