AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS 4th T20 | …तर भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात झाली असती बत्तीगुल ? काय आहे प्रकरण

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या चौथा टी 20 क्रिकेट सामन्याबाबत मिडीयात उलट सुलट बातम्या आल्याने अनिश्चितेचे सावट होते. छत्तीसगडच्या रायपूर क्रिकेट सामन्यासाठी तात्पुरता वीज पुरवठा करुन सामना खेळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

IND vs AUS 4th T20 | ...तर भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात झाली असती बत्तीगुल ? काय आहे प्रकरण
IND vs AUS 4th T20Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Dec 02, 2023 | 2:06 PM
Share

मुंबई | 2 डिसेंबर 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान रायपूर येथील शहीद वीर नारायण इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर 1 डिसेंबर रोजी पाच सामन्यांच्या टी – 20 क्रिकेट मालिकेतील चौथा सामना भारताने जिंकत मालिकाही खिशात घातली. परंतू या स्टेडियमचं तब्बल 3 कोटीचं वीज बिल राज्य सरकारने गेली अनेक वर्षे भरलं नसल्याचं उघडकीस आले आहे. त्यामुळे हा सामन्यावर गंभीर संकट ओढवले होते. जनरेटर लावून फ्लर्ड लाईट सुरु करण्यात आल्या होत्या. त्यावर शेवटच्या क्षणापर्यंत मॅच होईल की नाही अशा संशयाच्या भोवऱ्यात ही मॅच झाल्याचे उघडकीस आले आहे.

छत्तीसगढ येथील रायपूर क्रिकेट स्टेडियमला कायम स्वरुपी वीजपुरवठा नसल्याचे उघड झाले आहे. या मैदानाचे तीन कोटी रुपयाचं वीज बिल अनेक वर्षांपासून भरले नसल्याचे उघड झाले आहे. याचा तेथील क्रिकेट सामन्यांवर काही परिणाम होत नाही, कारण छत्तीसगढ राज्य क्रिकेट संघ जेव्हा गरज लागेल तेव्हा छत्तीसगढ राज्य विद्युत वितरण कंपनी लि. कडून तात्पुरते वीज कनेक्शन घेऊन मॅच भरवित वेळ मारून नेते. भारत आणि ऑस्ट्रेलिया टी 20 मॅचवरही त्यामुळे अनिश्चितेचे सावट होते. या संदर्भात मिडीयात उलटसुलट बातम्या आल्या होत्या. यावर स्टेडीयम निर्माण समितीच्या आवाहनानंतर 2010 मध्ये स्टेडियममध्ये वीज कनेक्शन देण्यात आले होते. 2018 पर्यंत प्रलंबित वीज बिल 3.16 कोटी रुपयांपर्यंत पोहचलं आहे. त्यानंतर वीज कनेक्शन कापल्याचे छत्तीसगढ राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडचे ( CSPDCL ) अभियंता अशोक खंडेलवाल यांनी म्हटले आहे.

यानंतर क्रिकेट स्टेडियम प्राधिकरणाने 200 केव्हीएने अस्थायी कनेक्शनसाठी अर्ज केला होता. येथे प्रेक्षक क्रिकेटचे सामने पाहायला येत असल्याने आयत्यावेळी तात्पुरते कनेक्शन देण्यात आले. शुक्रवारच्या मॅचसाठी देखील छत्तीसगड राज्य क्रिकेट अस्थायी कनेक्शन घेतले आणि कंपनीकडे दहा लाख रुपये भरले अशी माहीती खंडेलवाल यांनी दिली. आम्ही प्रलंबित वीज बिलासाठी राज्य क्रीडा आणि युवक कल्याण विभागाला नोटीस पाठविली आहे. विभागाने बजेटमध्ये तरतूद केली नसल्याचे सांगितले होते. अलिकडेच विभागाने सर्व प्रलंबित बिले भरण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.

येथे पहा ट्वीट –

जनरेटरचा वापर यासाठी केला ?

क्रिकेट असोसिएशनकडे स्टेडीयमची मालकी नाही. राज्य सरकारकडे त्याची मालकी आहे. त्याचा खर्च क्रीडा आणि युवक कल्याण खात्याकडे आहे. त्यामुळे आमच्याकडे त्याची जबाबदारी येत नसल्याचे छत्तीसगड राज्य क्रिकेट संघाचे अध्यक्ष जुबीन शाह यानी म्हटले आहे. अस्थायी वीज कनेक्शन शिवाय आमच्याकडे अतिरिक्त पर्याय आहेत. आधीही येथे अशाच प्रकारे मॅच झाल्या होत्या. स्टेडियममध्ये फ्लर्डलाईट जनरेटरवर सुरु होत्या. कारण अचानक वीज गेली तर जनरेटर सुरु करण्यासा अर्धा तास लागतो असेही शाह यांनी सांगितले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.