Team India: टीम इंडियासाठी 100 टी 20i सिक्स लगावणारे फलंदाज, सर्वाधिक कुणाच्या नावावर?

Most Sixes in T20 For India: अभिषेक शर्मा याने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात अर्धशतकी खेळीत 4 षटकार लगावले. अभिषेकने यासह टी 20i क्रिकेटमध्ये षटकारांचं शतक पूर्ण करत खास कामगिरी करुन दाखवली.

Team India: टीम इंडियासाठी 100 टी 20i सिक्स लगावणारे फलंदाज, सर्वाधिक कुणाच्या नावावर?
Abhishek Sharma India vs England 1st T20i
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Jul 02, 2026 | 9:34 PM

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील पहिला टी 20i सामना हा 1 जुलैला खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन अभिषेक शर्मा याने अर्धशतक ठोकलं. अभिषेकने इंग्लंड विरुद्ध 59 धावांची वादळी खेळी साकारली. अभिषेकने या दरम्यान 4 षटकार लगावले. अभिषेकने यासह टी 20i क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण केले. अभिषेक बॉलनुसार सर्वात वेगवान 100 सिक्स लगावणारा पहिला फलंदाज ठरला. अभिषेकने 785 बॉलमध्ये 100 सिक्स पूर्ण केले. या निमित्ताने टीम इंडियासाठी टी 20i मध्ये 100 षटकार लगावणाऱ्या फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

टीम इंडियासाठी आतापर्यंत टी 20i क्रिकेटमध्ये एकूण 5 फलंदाजांनी 100 पेक्षा अधिक षटकार लगावले आहेत. तसेच 5 पैकी एका फलंदाजाने 200 पेक्षा अधिक षटकार लगावले आहेत.

भारतासाठी सर्वाधिक टी 20i षटकार

माजी फलंदाज रोहित शर्मा याच्या नावावर टीम इंडियासाठी सर्वाधिक टी 20i षटकारांचा विक्रम आहे. रोहित 200 पेक्षा अधिक षटकार लगावणारा एकमेव भारतीय आहे. रोहितने टी 20i क्रिकेटमध्ये 205 षटकार लगावले आहेत. तर रोहितनंतर या यादीत दुसऱ्या स्थानी सूर्यकुमार यादव हा विराजमान आहे. सूर्याने आतापर्यंत 179 षटकार लगावले आहेत.

टी 20i मध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारे भारतीय

अभिषेक शर्मा : 102 षटकार
विराट कोहली : 124 षटकार
हार्दिक पंड्या : 126 षटकार
सूर्यकुमार यादव : 179 षटकार
रोहित शर्मा : 205 षटकार

सूर्यानंतर या यादीत तिसऱ्या स्थानी हार्दिक पंड्या विराजमान आहे. तर चौथ्या स्थानी माजी फलंदाज विराट कोहली आहे. तर अभिषेक शर्मा 100 टी 20i षटकार पूर्ण करणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. अभिषेक शर्मा टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान 100 षटकार लगावणारा फलंदाज ठरला आहे. अभिषेकने 785 बॉलमध्ये 100 षटकार लगावले आहेत.

पहिला सामना पावसामुळे रद्द

दरम्यान इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला टी 20i सामना हा पावसामुळे रद्द करावा लागला. या सामन्यातील पहिल्या डावाचा खेळ झाला. मात्र पावसामुळे दुसऱ्या डावातील खेळ होणार नसल्याने सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारताने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 189 धावा केल्या होत्या.

Follow Us