AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 IND vs AUS Final | टीम इंडियासमोर 254 धावांचं आव्हान, कोण जिंकणार वर्ल्ड कप?

India U19 vs Australia U19 Final 1st Innings Highlights In Marathi | ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला एकूण सहाव्यांदा विश्व विजेता होण्यासाठी 254 धावांचं आव्हान दिलं आहे.

U19 IND vs AUS Final | टीम इंडियासमोर 254 धावांचं आव्हान, कोण जिंकणार वर्ल्ड कप?
| Updated on: Feb 11, 2024 | 5:40 PM
Share

बेनोनी | अंडर 19 वर्ल्ड कप फायनल 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने भारतीय क्रिकेट संघाला विजयासाठी 254 धावांचं आव्हान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 253 धावा केल्या. अंडर 19 वर्ल्ड कप इतिहासात फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे आता टीम इंडियासमोरचं आव्हान हे डोंगराएवढं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे टीम इंडियाला 254 धावा करुन इतिहास रचण्याची संधी आहे.

ऑस्ट्रेलियाकडून हरजस सिंग याने सर्वाधिक धावा केल्या. हरजस याने 64 बॉलमध्ये 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 55 धावांची खेळी केली. तर कॅप्टन ह्यू वेबगेन याने 48 धावांचं योगदान दिलं. ऑलिव्हर पीक याने 43 बॉलमध्ये नाबाद 46 धावा केल्या. तर ओपनर हॅरी डीक्सन याने 42 धावा जोडल्या. विकेटकीपर रायन हीक्स याने 20 आणि चार्ली एंडरसन याने 13 धावा जोडल्या. तर टीम इंडियाकडून राज लिंबानी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. नमन तिवारी याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर सॉमी पांडे आणि मुशीर खान या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

आता फलंदाजांवर मदार

दरम्यान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 260 धावांच्या आत रोखल्यानंतर आता टीम इंडियाच्या फलंदाजांवर सर्व जबाबदारी आहे. टीम इंडियाचे फलंदाजांनी या स्पर्धेत आतपर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. कॅप्टन उदय सहारन, बीडचा सचिन धस, सोलापूरचा अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान आणि आदर्श सिंह यांनी बॅटिंगने अफलातून खेळी केली आहे. आता या फलंदाजांकडून अशाच तडाखेदार फलंदाजीची अपेक्षा असणार आहे.

ऑस्ट्रेलियाला 254 धावांवर रोखण्यात यश

ऑस्ट्रेलिया अंडर 19 प्लेईंग ईलेव्हन | ह्यू वेबगेन (कॅप्टन), हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, चार्ली अँडरसन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन आणि कॅलम विडलर

टीम इंडिया अंडर 19 प्लेईंग इलेव्हन | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्य पांडे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.