विराट कोहली अजून 2 वर्ष टीम इंडियाचं नेतृत्व करु शकला असता; द. आफ्रिकेतील पराभवानंतर रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य

दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर संघाच्या नेतृत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला. विराट कोहली (Virat Kohli) या पदावरुन पायउतार झाला आहे. तो आता क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये संघाचा कर्णधार राहिलेला नाही.

विराट कोहली अजून 2 वर्ष टीम इंडियाचं नेतृत्व करु शकला असता; द. आफ्रिकेतील पराभवानंतर रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य
Virat Kohli - Ravi Shastri
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 11:55 AM

मुंबई : दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर संघाच्या नेतृत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला. विराट कोहली (Virat Kohli) या पदावरुन पायउतार झाला आहे. तो आता क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये संघाचा कर्णधार राहिलेला नाही. बीसीसीआयने (BCCI) व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये (ODI And T-20) रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधार बनवलं आहे. परंतु कसोटी संघाचा कर्णधार कोण होणार याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. कारण द. आफ्रिकेविरुद्ध खेळवण्यात आलेली कसोटी मालिका 2-1 अशी गमावल्यानंतर विराटने कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याच निर्णय घेतला. अशातच आता भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी विराट कोहली आणि भारताच्या कर्णधारपदाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

दी इंडियन एक्सप्रेससोबत बोलत असताना शास्त्री म्हणाले की, तो (विराट) अगदी सहजपणे अजून दोन वर्ष भारतीय कसोटी संघाचा कर्णधार राहिला असता. पण त्याने आता राजीनामा दिला आहे. आपण त्याच्या या निर्णयाचा आदर करायला हवा. 2021 च्या T20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री यांचा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपुष्टात आला होता. त्यानंतर राहुल द्रविडकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

माझी कारकीर्द समाधानकारक

विराट कोहली आणि रवी शास्त्री जेव्हा कर्णधार आणि प्रशिक्षक होते, तेव्हा भारताने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकली आणि इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेत 2-1 अशी आघाडीही घेतली, या मालिकेतील अंतिम कसोटी सामना या वर्षाच्या मध्यात खेळवला जाईल. शास्त्री यांनी भारतीय संघातील त्यांचा प्रशिक्षक म्हणून सात वर्षांचा कार्यकाळ समाधानकारक असल्याचे म्हटले आहे. तसेच या संघाचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगितले.

कसोटी कर्णधार कोण?… जाणून घ्या रवी शास्त्रींचे उत्तर

जेव्हा शास्त्री यांना विचारण्यात आले की, टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार कोण असावा? याबाबत त्यांची पहिली पसंती कोणाला आहे? यावर शास्त्री म्हणाले, “सर्वप्रथम, मी सांगेन या संघाचे भविष्य उज्ज्वल आहे. मी गेल्या 7 वर्षात जे काही पाहिलं आहे त्यावरून, प्रत्येक नवीन खेळाडू आला आहे तो विलक्षण आहे. कर्णधाराचा विचार केला तर रोहित शर्मा दोन फॉरमॅटमध्ये संघाचा कर्णधार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले होते. दुखापतीमुळे तो जाऊ शकला नाही ही वेगळी बाब. पण त्याला जर उपकर्णधार बनवलं होतं तर विराट नंतर त्यालाच कर्णधार बनवण्याचाही विचार सुरू आहे.

विराट कोहली

IND vs SA: पराभव जिव्हारी लागला, हाफ सेंच्युरी झळकवणाऱ्या दीपक चहरच्या डोळ्यात आलं पाणी पाहा VIDEO

Video | कधी काळी फ्लाईंग किस जायचा, आता बॅटचाच पाळणा झाला! युजर्स म्हणाले ‘शेवटी बापाचं काळीजए!’

स्ट्राईक रेटच्या प्रश्नावर मिताली राज भडकली, म्हणाली ‘फक्त आमच्या नको, दुसऱ्या टीमवरही लक्ष द्या’

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.