AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियात उभी फूट, विराट कोहली लवकरच संन्यास घेणार; दिग्गज पाकिस्तानी खेळाडूचं भाकित

विराट कोहली आता भारतीय क्रिकेट संघाचा टी-20 फॉरमॅटचा कर्णधार नाही. त्याच्या जागी ही जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. कोहलीने ICC T20 विश्वचषक-2021 पूर्वीच सांगितले होते की, तो खेळाच्या या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची जबाबदारी घेणार नाही.

टीम इंडियात उभी फूट, विराट कोहली लवकरच संन्यास घेणार; दिग्गज पाकिस्तानी खेळाडूचं भाकित
Virat Kohli
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 10, 2021 | 10:57 AM
Share

मुंबई : विराट कोहली आता भारतीय क्रिकेट संघाचा टी-20 फॉरमॅटचा कर्णधार नाही. त्याच्या जागी ही जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. कोहलीने ICC T20 विश्वचषक-2021 पूर्वीच सांगितले होते की, तो खेळाच्या या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची जबाबदारी घेणार नाही. मात्र, विराट कोहलीला कर्णधार म्हणून निरोप देता आला नाही. या संघाला टी-20 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठता आली नाही. विराट कोहलीचा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय अनेकांना आवडला नाही आणि त्यामुळेच अनेकजण त्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. पाकिस्तानचा माजी लेगस्पिनर मुश्ताक अहमदने तर कोहलीच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयावरून टीम इंडियामध्ये काहीतरी गडबड असल्याचे स्पष्ट होते, असे म्हटले आहे. मुश्ताकने कोहलीच्या निवृत्तीबद्दलही वक्तव्य केले आहे. (Virat Kohli quitting T20 captaincy shows all is not well in Indian dressing room, he could soon take retirement : Mushtaq Ahmed)

मुश्ताक पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ न्यूजवर म्हणाला की, “जेव्हा एखादा यशस्वी कर्णधार म्हणतो की, त्याला कर्णधारपद सोडायचे आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की ड्रेसिंग रूममध्ये सर्व काही ठीक चाललेलं नाही. मला सध्या टीम इंडियामध्ये दोन गट दिसत आहेत. एक गट मुंबईचा आणि एक गट दिल्लीचा आहे. मला वाटतं कोहली लवकरच T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होईल. मात्र, तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत राहील.

आयपीएलमुळे भारताचा खेळ बिघडला

वर्ल्डकपमधील खराब कामगिरीनंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले होते की, बायो बबलमध्ये बराच काळ राहिल्याने टीमच्या खेळाडूंवर आणि त्यांच्या खेळावर परिणाम झाला, ज्याचा थेट परिणाम आपण वर्ल्ड कपमध्ये पाहिला. विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू IPL-2021 मध्ये खेळत होते. याआधी भारतीय संघ जूनपासून इंग्लंड दौऱ्यावर होता आणि सतत बायो बबलमध्ये राहत आहे. मुश्ताक म्हणाला, “मला वाटते की आयपीएलमुळे भारतीय संघ फ्लॉप ठरला. मला वाटते की, त्यांचे खेळाडू विश्वचषकाच्या खूप आधीपासून बायो बबलमध्ये आहेत आणि त्यामुळे ते थकले होते.”

इंझमामचा पाठिंबा

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकनेही मान्य केले आहे की, बायो बबलमध्ये दीर्घकाळ राहण्याचा टीम इंडियाच्या खेळाडूंवर परिणाम झाला आहे. तो म्हणाला, “मी रवी शास्त्री यांच्याशी सहमत आहे की, भारतीय खेळाडू विश्वचषकासाठी मानसिकदृष्ट्या तयार नव्हते. ते लोक आयपीएलमुळे थकले होते आणि ते सुरुवातीच्या सामन्यांमध्ये दिसून आले.

इतर बातम्या

India vs New Zealand: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, 3 खेळाडू करणार टीम इंडियामधून डेब्यू, आयपीएलमधील कामगिरीनंतर BCCI कडून संधी

T20 World Cup मधील प्रदर्शनानंतर दिनेश कार्तिकने निवडली त्याची प्लेयिंग 11, बाबर आजम कर्णधार, रोहित-विराट बाहेर

(Virat Kohli quitting T20 captaincy shows all is not well in Indian dressing room, he could soon take retirement : Mushtaq Ahmed)

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक