AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virender Sehwag : WTC फायनलमधील पराभवानंतर वीरेंद्र सेहवाग स्पष्टच बोलला, म्हणाला…

Team India : टीम इंडियाला आधी लवकर विकेट घेता आल्या नाहीत आणि दोन्ही डावात टॉप ऑर्डरचे सपशेल अपयशी ठरले. प्लइंग 11 मध्ये अश्विनला स्थान न दिल्याने टीम मॅनेजमेंटवर क्रिकेट विश्वातील आजी-माजी खेळाडू बोट दाखवत आहेत. अशातच रविवारी झालेल्या पराभवावर माजी स्फोटक खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Virender Sehwag : WTC फायनलमधील पराभवानंतर वीरेंद्र सेहवाग स्पष्टच बोलला, म्हणाला...
| Updated on: Jun 12, 2023 | 4:51 PM
Share

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल 2023 सामन्यात टीम इंडियाचा 209 धावांनी दारूण पराभव झाला. टीम इंडियाला सामन्यामध्ये एकदाही वर्चस्व दाखवता आलं नाही, शेवटच्या दिवसापर्यंत कांगारूंची पकड होती. अगदी ठरवलेल्या नियोजनानुसार त्यांनी खेळ करत फायनल जिंकली. टीम इंडियाला आधी लवकर विकेट घेता आल्या नाहीत आणि दोन्ही डावात टॉप ऑर्डरचे सपशेल अपयशी ठरले. प्लइंग 11 मध्ये अश्विनला स्थान न दिल्याने टीम मॅनेजमेंटवर क्रिकेट विश्वातील आजी-माजी खेळाडू बोट दाखवत आहेत. अशातच रविवारी झालेल्या पराभवावर माजी स्फोटक खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला वीरेंद्र सेहवाग?

WTC फायनल जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन. ते या विजयाचे हकदार होते. ऑस्ट्रेलियाच्या मजबूत डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध संघाने अश्विनला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हाच भारत हा सामना मानसिकदृष्ट्या हरला होता. टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांबाबत सेहवाग म्हणाला, ‘संघाच्या टॉप ऑर्डरच्या खेळाडूंना चांगली फलंदाजी करण्याची गरज होती. त्यासोबतच चॅम्पियनशीप जिंकण्यासाठी चांगली मानसिकता आणि दृष्टीकोन आवश्यक असल्याचंही सेहवागने सांगितलं.

आर. अश्विन भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातील अव्वल फिरकीपटूल तुम्ही जर संघाबाहेर करत असाल तर तुमचाच आत्मविश्वास कमी असल्याचं दिसून येतं. सचिन तेंडुलकरनेही अश्निला बाहेर ठेवण्यावरून मॅनेजमेंटवर निशाणा साधला होता.

ऑस्ट्रेलिया संघाने उत्कृष्ट खेळ केला यामध्ये काही शंका नाहीच मात्र टीम इंडियाची बॅटींग पूर्णपणे फेल गेली. एकट्याच्या जोरावर अनेकवेळा सामने काढून देणारे तोडीसतोड मॅचनविनर खेळाडू फेल गेले. हा पराभव सर्वांच्याच जिव्हारी लागला आहे. सलग दुसऱ्यांदा फायनल गाठून टीम इंडियाचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं आहे.

Follow Us
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.