AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : टीम इंडियाने फायनलमध्ये टॉस जिंकला, इंग्लंड विरुद्ध बॅटिंग, मालिका जिंकण्यासाठी किती धावांचं आव्हान पुरेसं?

England Women vs India Women 3rd ODI Toss : भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांनी 3 सामन्यांच्या मालिकेत प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे.त्यामुळे तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात दोन्ही संघात चांगलीच चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

ENG vs IND : टीम इंडियाने फायनलमध्ये टॉस जिंकला, इंग्लंड विरुद्ध बॅटिंग, मालिका जिंकण्यासाठी किती धावांचं आव्हान पुरेसं?
WENG vs WIND 3rd Odi TossImage Credit source: @BCCIWomen X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 22, 2025 | 5:52 PM
Share

शुबमन गिल याच्या नेतृत्वात मेन्स टीम इंडिया 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स टीम इंडिया टी 20I नंतर आता एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी सज्ज आहे. हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वूमन्स टीम इंडिया 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांकडे मालिका जिंकण्याची बरोबरीची संधी आहे. उभयसंघातील तिसऱ्या आणि अंतिम सामन्याचं आयोजन हे आज 22 जुलै रोजी रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ले-स्ट्रीट येथे करण्यात आला आहे.

उभयसंघातील तिसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 5 वाजता टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार हरमनप्रीत कौर हीने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी भारताचा इंग्लंडसमोर जास्तीत जास्त धावांचा आव्हान ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे.

भारताने मालिकेत विजयी सलामी देत 1-0 ने आघाडी घेतली होती. त्यानतंर पावसामुळे दुसरा सामना 50 षटकांचा होऊ शकला नाही.तसेच भारतीय फलंदाजांनीही निराशा केली. भारताला 29 ओव्हरमध्ये 150 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. त्यानंतर दुसऱ्या डावात पावसाने व्यत्यय आणल्याने इंग्लंडला सुधारित आव्हान मिळालं. इंग्लंडने हे आव्हान सहज पूर्ण करत मालिकेत बरोबरी साधली.

भारतीय फलंदाज धावांचा डोंगर उभारणार?

त्यानंतर आता निर्णायक सामन्यात टीम इंडिया टॉसचा बॉल ठरला. त्यामुळे भारतीय संघाचा इंग्लंडसमोर धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न असणार आहे. आता या प्रयत्नात भारतीय फलंदाज किती यशस्वी होतात? हे पहिल्या डावानंतरच स्पष्ट होईल.

भारताने टॉस जिंकला

इंग्लंड वूमन प्लेइंग ईलेव्हन : टॅमी ब्यूमोंट, एमी जोन्स (विकेटकीपर), एम्मा लॅम्ब, नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), सोफिया डंकले, अॅलिस डेव्हिडसन रिचर्ड्स, चार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, लिन्सी स्मिथ, लॉरेन फाइलर आणि लॉरेन बेल.

टीम इंडिया वूमन प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मंधाना, प्रतीका रावल, हर्लीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, स्नेह राणा, श्री चरणी आणि क्रांती गौड.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता