AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Retirement : मॅचविनर ऑलराउंडरकडून निवृत्तीची घोषणा, 2 सामन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार

International Cricket Retierment : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला आहे. या दरम्यान स्टार ऑलराउंडरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

Retirement : मॅचविनर ऑलराउंडरकडून निवृत्तीची घोषणा, 2 सामन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार
Hardik Pandya and Andre RussellImage Credit source: Getty Images
| Updated on: Jul 17, 2025 | 12:42 AM
Share

क्रिकेट विश्वात सध्या कसोटी मालिकेचा थरार पाहायला मिळत आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 अशा फरकाने पिछाडीवर आहे. तर उभयसंघातील चौथा सामना हा 23 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला वेस्ट इंडिजला मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका गमावण्याची वेळ आली. ऑस्ट्रेलियाने विंडीजला कसोटी मालिकेत 3-0 ने व्हाईटवॉश केलं. त्यानंतर आता विंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 टी 20i सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

विंडीज क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या मालिकेतून विंडीजचा स्टार ऑलराउंडर आंद्रे रसेल याचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र रसेलने या मालिकेदरम्यान निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका लागला आहे.

आंद्रे रसेल निवृत्त होणार

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्ट्सनुसार, आंद्रे रसेल सबीना पार्कमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टी 20I सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. रसेल 2019 पासून विंडीजसाठी फक्त टी 20 फॉर्मेटमध्ये खेळत आहे. रसेलने विंडीजचं 84 टी 20I सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. भारत आणि श्रीलंकेत 2026 मध्ये टी 20I वर्ल्ड कप होणार आहे. त्याआधी रसेलने निवृत्तीचा निर्णय घेतल्याने चाहत्यांसह क्रिकेट बोर्डासाठी हा मोठा झटका आहे.

रिपोर्ट्सनुसार, रसेलला आगामी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत खेळायचं होतं. मात्र रसेलने फ्रँचायजी क्रिकेटकडे लक्ष केंद्रीत करायचं ठरवल्याने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. रसेल विंडीजच्या 2 टी 20I वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग राहिला आहे. विंडीजने 2012 आणि 2016 साली टी 20I वर्ल्ड कप जिंकला होता.

रसेलने विंडीजचं आतापर्यंत 1 कसोटी, 56 एकदिवसीय आणि 84 टी 20I सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. रसेलने टेस्टमध्ये 2 धावा करण्यासह 1 विकेट घेतली आहे. रसेलने एकदिवसीय कारकीर्दीत 1 हजार 34 धावा केल्या आहेत. तसेच 70 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. तसेच रसेलने टी 20I क्रिकेटमध्ये 1 हजार 78 धावा कुटण्यासह 61 विकेट्स मिळवल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी वेस्टइंडिज टीम : शाई होप (कर्णधार), ज्वेल एंड्रयू, जेडिया ब्लेड्स, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, अकील हुसैन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, गुडाकेश मोती, रोवमॅन पॉवेल, आंद्रे रसेल, शेरफेन रूदरफोर्ड आणि रोमारियो शेफर्ड.

Follow Us
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण.
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड.
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?.
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर.