AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरसीबी विजयी परेडमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? कुठे काय चुकलं? जाणून घ्या

आरसीबीच्या विजयी जल्लोषाला गालबोट लागलं आणि 10 चाहत्यांना जीव गमवावा लागला. आरसीबीने 17 वर्षानंतर जेतेपद मिळवल्याने आनंद होता. मात्र या घटनेमुळे आनंदावर विरजण पडलं. ही दुर्घटना कशी घडली आणि यासाठी कोण जबाबदार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

आरसीबी विजयी परेडमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? कुठे काय चुकलं? जाणून घ्या
आरसीबी विजयी परेडमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? कुठे काय चुकंल? जाणून घ्याImage Credit source: video grab
| Updated on: Jun 04, 2025 | 8:04 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेचं जेतेपद मिळवल्यानंतर आरसीबीच्या चाहत्यांचा उत्साह गगनात मावेनासा झाला होता. गेली 17 वर्षे चषक नाही म्हणून सोशल मीडियावर डिवचलं जात होतं. पण चषक हाती आल्याने डिवचण्याची संधीच मिळणार नाही, म्हणून कार्यकर्ते उत्साही होते. त्यामुळे आपल्या संघाची एक झलक पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. विजयी जल्लोषाचे प्रत्येक क्षण डोळ्यात साठवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न होता. पण एका क्षणात या आनंदावर विरजण पडलं. काही कळायच्या आत चेंगराचेंगरी झाली आणि दहा चाहत्यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे आनंदाच्या क्षणी निराशेचं वातावरण पसरलं. चिन्नास्वामी स्टेडियमवर यापूर्वी असंख्य सामने झाले आहेत. लोकांनी स्टेडियमवर गर्दी केली होती. पण यासारखी भयानक दुर्घटना कधीच घडली नव्हती. या भयानक घटनेनंतर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एक निवेदन जारी करत म्हटले की, आयोजकांनी आरसीबीच्या आयपीएल विजयाच्या जल्लोषाचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करायला हवे होते. दुसरीकडे, आयपीएल जिंकणाऱ्या विविध संघांनी आपापल्या शहरांमध्ये विजय साजरा केला आहे. केकेआर, मुंबई इंडियन्स, सीएसके सारख्या संघांनी भव्य केलं होतं. पण आयपीएल जिंकल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी आयोजन केलं होतं. पण आरसीबीच्या विजयानंतर यात घाई केल्याचं बोललं जात आहे.

सरकारने चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी विजयोत्सवाचे आयोजन केले होते. त्यामुळे कर्नाटकात राजकारण तापलं आहे. कर्नाटक भाजप अध्यक्ष बी वाय विजयेंद्र म्हणाले की, “या दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे. जेव्हा संपूर्ण देश आणि कर्नाटक आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करत होते, तेव्हा राज्य सरकारने कोणतीही तयारी न करता विजय रॅली आयोजित करण्याची घाई केल्याने ही दुर्घटना घडली. रुग्णवाहिकेची सुविधा नव्हती. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश द्यावेत.”

अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?
अजितदादा प्लास्टिक बॉटल ऐवजी काचेची बॉटल का वापरत होते?.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत मला शंका, रोहित पवारांचा खळबळजनक दावा.
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.