AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरसीबी विजयी परेडमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? कुठे काय चुकलं? जाणून घ्या

आरसीबीच्या विजयी जल्लोषाला गालबोट लागलं आणि 10 चाहत्यांना जीव गमवावा लागला. आरसीबीने 17 वर्षानंतर जेतेपद मिळवल्याने आनंद होता. मात्र या घटनेमुळे आनंदावर विरजण पडलं. ही दुर्घटना कशी घडली आणि यासाठी कोण जबाबदार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

आरसीबी विजयी परेडमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? कुठे काय चुकलं? जाणून घ्या
आरसीबी विजयी परेडमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? कुठे काय चुकंल? जाणून घ्याImage Credit source: video grab
| Updated on: Jun 04, 2025 | 8:04 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेचं जेतेपद मिळवल्यानंतर आरसीबीच्या चाहत्यांचा उत्साह गगनात मावेनासा झाला होता. गेली 17 वर्षे चषक नाही म्हणून सोशल मीडियावर डिवचलं जात होतं. पण चषक हाती आल्याने डिवचण्याची संधीच मिळणार नाही, म्हणून कार्यकर्ते उत्साही होते. त्यामुळे आपल्या संघाची एक झलक पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. विजयी जल्लोषाचे प्रत्येक क्षण डोळ्यात साठवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न होता. पण एका क्षणात या आनंदावर विरजण पडलं. काही कळायच्या आत चेंगराचेंगरी झाली आणि दहा चाहत्यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे आनंदाच्या क्षणी निराशेचं वातावरण पसरलं. चिन्नास्वामी स्टेडियमवर यापूर्वी असंख्य सामने झाले आहेत. लोकांनी स्टेडियमवर गर्दी केली होती. पण यासारखी भयानक दुर्घटना कधीच घडली नव्हती. या भयानक घटनेनंतर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एक निवेदन जारी करत म्हटले की, आयोजकांनी आरसीबीच्या आयपीएल विजयाच्या जल्लोषाचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करायला हवे होते. दुसरीकडे, आयपीएल जिंकणाऱ्या विविध संघांनी आपापल्या शहरांमध्ये विजय साजरा केला आहे. केकेआर, मुंबई इंडियन्स, सीएसके सारख्या संघांनी भव्य केलं होतं. पण आयपीएल जिंकल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी आयोजन केलं होतं. पण आरसीबीच्या विजयानंतर यात घाई केल्याचं बोललं जात आहे.

सरकारने चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी विजयोत्सवाचे आयोजन केले होते. त्यामुळे कर्नाटकात राजकारण तापलं आहे. कर्नाटक भाजप अध्यक्ष बी वाय विजयेंद्र म्हणाले की, “या दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे. जेव्हा संपूर्ण देश आणि कर्नाटक आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करत होते, तेव्हा राज्य सरकारने कोणतीही तयारी न करता विजय रॅली आयोजित करण्याची घाई केल्याने ही दुर्घटना घडली. रुग्णवाहिकेची सुविधा नव्हती. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश द्यावेत.”

Follow Us
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.