AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

chetan sharma : Virat Kohli ला कॅप्टनशिपवरुन हटवण्यात कोणाचा महत्त्वाचा रोल? स्टिंग ऑपरेशनमधून खुलासा

chetan sharma : क्रिकेटचे विश्लेषक आणि क्रिकेट चाहत्यांना नक्कीच यामुळे धक्का बसेल. फक्त भारतीय क्रिकेटच नाही, जागतिक क्रिकेटमध्ये या स्टिंग ऑपरेशनचे हादरे जाणवतील. चेतन शर्मा हे क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत.

chetan sharma : Virat Kohli ला कॅप्टनशिपवरुन हटवण्यात कोणाचा महत्त्वाचा रोल? स्टिंग ऑपरेशनमधून खुलासा
virat kohli
| Updated on: Feb 15, 2023 | 8:26 AM
Share

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संदर्भात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. बीसीसीआयच्या सिलेक्शन कमिटीचे प्रमुख चेतन शर्मा यांचं एक स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं. त्यातून हैराण करुन टाकणाऱ्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. क्रिकेटचे विश्लेषक आणि क्रिकेट चाहत्यांना नक्कीच यामुळे धक्का बसेल. फक्त भारतीय क्रिकेटच नाही, जागतिक क्रिकेटमध्ये या स्टिंग ऑपरेशनचे हादरे जाणवतील. चेतन शर्मा हे क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. ते आपल्या निर्णयाने एखाद्या खेळाडूच करिअर बनवू शकतात आणि एखाद्याच करिअर खराबही करु शकतात. त्यांनी मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर क्रिकेट विश्वात खळबळ उडवून देणारे दावे केले आहेत.

गांगुली-विराट वादात काय घडलं?

क्रिकेटला जंटलमन्स गेम म्हटलं जातं. पण या खेळात पडद्यामागे बरच काही घडत असतं. त्यामुळे क्रिकेटला जंटलमन्स गेम म्हणता येणार नाही. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्यातील वादासंदर्भात धक्कादायक खुलासा केलाय. कुठलीही पूर्वकल्पना न देता आपल्याला कॅप्टनशिपवरुन हटवण्यात आलं, असा आरोप विराट कोहलीने सौरव गांगुलीवर केला होता.

खुलासा पॉइंट्समधून समजून घ्या

विराट कोहलीला कॅप्टनशिपवरुन हटवण्यात कोणाचा महत्त्वाचा रोल होता? चेतन शर्मा यांनी या संदर्भात काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. चेतन शर्मांनी केलेला खुलासा पॉइंट्समधून समजून घ्या.

विराटला कोणी हटवलं?

विराट कोहलीला कॅप्टनशिपवरुन हटवण्याचा निर्णय सौरव गांगुलीने घेतला नव्हता.

कोणाचा इगो मोठा होता?

गांगुली आणि विराट कोहलीमध्ये वादाच सर्वात मोठं कारण होतं, विराटचा इगो.

तिसरी महत्त्वाची बाब

कोहलीला वाटायच की, गांगुलीमुळे त्याला कॅप्टनशिप गमवावी लागली.

कोणाचे आरोप खोटे?

विराट कोहलीने गांगुलीवर जे आरोप केले ते खोटे होते.

पाचवी बाब

विराट कोहलीने जाणूनबुजून गांगुलीवर आरोप केले. चेतन शर्माने हे सर्व खुलासे केलेत. गांगुलीने विराटला टीम इंडियाच्या कॅप्टनशिपवरुन हटवण्याचा निर्णय घेतला नाही, मग हा निर्णय कोणाचा होता? त्याच उत्तरही चेतन शर्माने दिलय.

चेतन शर्मा यांनी जे सांगितलं, त्याचं सार हेच आहे की, विराट कोहलीला मर्यादीत षटकाच्या क्रिकेटमध्ये कॅप्टनशिपवरुन हटवण्याचा निर्णय चेतन शर्मा यांचा होता. त्याचा गांगुलीशी काहीही संबंध नाही. विराटला कॅप्टनशिपवरुन हटवून रोहित शर्माला कॅप्टन बनवण्याचा निर्णय सिलेक्शन कमिटीचा होता.

Follow Us
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं...
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं....
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट.
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात...
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात....
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा...
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा....
सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला
सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला.
मोठी बातमी! शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी एक नाव जवळपास निश्चित, मात्र..
मोठी बातमी! शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी एक नाव जवळपास निश्चित, मात्र...
थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केजरीवालांचं पत्र
थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केजरीवालांचं पत्र.
मतदारांवर दबाव आणण्यासाठी... बंगाल निवडणुकीबाबत राऊतांचं मोठं विधान
मतदारांवर दबाव आणण्यासाठी... बंगाल निवडणुकीबाबत राऊतांचं मोठं विधान.
विदर्भ होरपळला; अमरावतीत 46°C, सात वर्षांचा विक्रम मोडला
विदर्भ होरपळला; अमरावतीत 46°C, सात वर्षांचा विक्रम मोडला.
मराठी सक्तीवरून मुंबईत राजकारण तापलं; मुंडेंचा मराठी माणसालाच इशारा?
मराठी सक्तीवरून मुंबईत राजकारण तापलं; मुंडेंचा मराठी माणसालाच इशारा?.