AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकपसाठी हार्दिक पांड्याला स्थान मिळणार की नाही? वेंकटेश प्रसादच्या ट्वीटमुळे खळबळ

आयपीएल स्पर्धेला आता रंग चढू लागला आहे. कोणते खेळाडू फॉर्मात कोणते नाहीत हे कळू लागलं आहे. असं असताना बीसीसीआयसमोर एक नवा पेच निर्माण झाला आहे. 1 जून रोजी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये स्पर्धेचं आयोजन होणार आहे. संघ निवडताना बीसीसीआयची दमछाक होणार आहे. दरम्यान माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यांनी दिलेल्या पर्यायाने खळबळ उडाली आहे.

टी20 वर्ल्डकपसाठी हार्दिक पांड्याला स्थान मिळणार की नाही? वेंकटेश प्रसादच्या ट्वीटमुळे खळबळ
| Updated on: Apr 09, 2024 | 2:50 PM
Share

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया आणखी एका आयसीसी चषकात खेळणार आहे. गेल्या 11 वर्षातील आयसीसी चषकांचा दुष्काळ दूर करण्याची आणखी एक संधी आहे. वर्ल्डकप स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणार असून यासाठी खेळाडूंची पारख केली जात आहे. रोहित शर्मा कर्णधार असणार आहे. तर विराट कोहलीची सध्याचा फॉर्म पाहता संघात निवड होणार यात शंका नाही. असं असताना माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद याच्या ट्वीटने खळबळ उडाली आहे. वेंकटेश प्रसादने तीन नावांची शिफारस निवड समितीकडे केली आहे. प्रसादने एक्सवर लिहिलं आहे की, “शिवम दुबे स्पिनर्सविरुद्ध मोठे शॉट्स खेळण्यासाठी, सूर्यकुमार यादव सर्वोत्तम टी20 आंतरराष्ट्रीय फलंदाज आणि रिंकू सिंह फिनिशिंगसाठी संघात असायला हवा. टी20 विश्वचषकात प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केलं तर एकदम मस्त होईल.”

वेंकटेश प्रसादचं ट्वीट इथपर्यंत ठीक होतं. पण त्यानंतर लिहिलेल्यचा वाक्यांचा अर्थ वेगळाच निघत आहे. सोशल मीडियावर जो तो आपल्या पद्धतीने अंदाज बांधत आहे. “संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या उपस्थितीमुळे पाच जागा होतील. त्यानंतर फक्त यष्टीरक्षक फलंदाजासाठी जागा उरणार आहे. आता यातून काय बाहेर येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.” वेंकटेश प्रसादच्या या ट्वीटचा अर्थ अष्टपैलू हार्दिक पांड्याला संघात स्थान मिळणं कठीण आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्यानंतर साखळी फेरीतच स्पर्धेतून बाहेर गेला होता. त्यानंतर ट्रेड विंडोच्या माध्यमातून मुंबई इंडियन्समध्ये आला आणि त्याला कर्णधारपद सोपवलं गेलं. वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर हार्दिक पांड्या थेट आयपीएल स्पर्धेत उतरला. पण त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यापैकी तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यात त्याची कामगिरी हवी तशी नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याची निवड होते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे, शिवम दुबेने चेन्नई सुपर किंग्ससाठी 160 च्या स्ट्राईक रेटने 176 धावा केल्या आहेत. एक दमदार अर्धशतक झळकावलं आहे. तर फिरकीपटूंना झोपटण्याचा त्याचा हातखंडा आहे. त्यामुळे वेंकटेश प्रसादने दिलेले पर्याय निवड समिती कशी हाताळते याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. विश्वचषकासाठी संघ निवडीची अंतिम तारीख 1 मे आहे. तर संघामध्ये फक्त एकच बदल करण्याची संधी 25 मे पर्यंत असेल.

मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.