AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात दोन विकेटकीपर खेळणार? गौतम गंभीरने सरावादरम्यान दिले असे संकेत

भारतीय संघ तीन टी20 सामने आणि तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर आहे. 27 जुलैपासून टी20 मालिकेला सुरुवात होईल. पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत उत्सुकता लागून आहे. असं असताना गौतम गंभीरकडून सराव करताना काही संकेत मिळताना दिसत आहेत.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात दोन विकेटकीपर खेळणार? गौतम गंभीरने सरावादरम्यान दिले असे संकेत
| Updated on: Jul 24, 2024 | 7:16 PM
Share

श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाचा कसून सराव सुरु आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया सज्ज झाली आहे. गौतम गंभीरने खेळाडूंना सरावादरम्यान काही धडे दिले. या सराव शिबीराचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. या व्हिडीओतून टीम इंडियाची पहिल्या टी20 प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत संकेत मिळत आहेत. टी20 संघात ऋषभ पंत आणि संजू सॅमसन या दोन विकेटकीपर फलंदाजांना संधी देण्यात आली आहे. दोघंही टी20 वर्ल्डकप संघात होते. मात्र संजू सॅमसनला एकही सामना खेळण्यास मिळाला नाही. तर ऋषभ पंत सर्व सामन्यात खेळला. झिम्बाब्वे दौऱ्यात ऋषभ पंतच्या गैरहजेरीत संजू सॅमसन खेळला होता. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात पुन्हा एकदा संजू सॅमसनला बाकावर बसावं लागेल अशी चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे. पण बीसीसीआयच्या व्हिडीओतून काही क्रीडाप्रेमींनी वेगळाच अंदाज बांधला आहे. प्लेइंग दोन विकेटकीपर दिसतील असं त्यांचं म्हणणं आहे. सराव शिबिरात गौतम गंभीर विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनसोबत चर्चा करताना दिसत आहे. गंभीर त्याला फलंदाजीचे बारकावे सांगत होता आणि संजू त्याची प्रत्येक गोष्ट तितक्याच आत्मयितेने ऐकत होता.

संजू सॅमसन आतापर्यंत 28 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळला आहे. त्याने 28 सामन्यात 133.33 च्या स्ट्राईक रेटने 444 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश असून 77 ही सर्वोत्तम खेळी आहे. संजू सॅमसनसोबत गंभीरने शिवम दुबेसोबतही चर्चा केली. शिवम दुबे टी20 वर्ल्डकपमध्ये सर्व सामने खेळला होता. झिम्बाब्वे दौऱ्यातही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. अष्टपैलू खेळाडू असल्याने हार्दिक पांड्यासोबत शिवम दुबे प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल असं सांगण्यात येत आहे.

अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशवी जयस्वाल, रिंकू सिंह,ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे/रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.

भारताचा टी20 संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशवी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.

Follow Us
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश