AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्या दोन सामन्यांमधील पराभव विराटच्या जिव्हारी, म्हणाला, ‘ती दोन षटकं मिळायला हवी होती…’

2021 च्या T-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग दोन विजय मिळवले आहेत. या सामन्यांमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे टीम इंडियाने आपली निव्वळ धावगतीही (नेट रनरेट) सुधारली आहे.

पहिल्या दोन सामन्यांमधील पराभव विराटच्या जिव्हारी, म्हणाला, 'ती दोन षटकं मिळायला हवी होती...'
Virat Kohli
| Edited By: | Updated on: Nov 06, 2021 | 11:28 AM
Share

मुंबई : 2021 च्या T-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग दोन विजय मिळवले आहेत. या सामन्यांमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे टीम इंडियाने आपली निव्वळ धावगतीही (नेट रनरेट) सुधारली आहे. स्कॉटलंडला एकतर्फी पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध चांगला खेळ का केला नाही, याचा खेद कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध अशी काही चांगली षटके मिळू शकली नाहीत, असे विराट म्हणाला. (Wish we had couple of good overs against Pakistan and New Zealand, Virat Kohli expressed regret)

स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात भारताने विजयासाठी 6.3 षटकांत 86 धावांचे लक्ष्य गाठले. गेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव केला होता. पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पहिले दोन सामने गमावल्यानंतर आता उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या भारताच्या आशा अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर अवलंबून आहेत. यामध्ये अफगाणिस्तानने विजय मिळवला तर अंतिम-4 मध्ये पोहोचण्याच्या भारताच्या आशा बळकट होतील.

सामना संपल्यानंतर विराट कोहली म्हणाला, “ही चांगली कामगिरी होती. आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करत होतो. आजच्या सामन्याबद्दल जास्त काही बोलणार नाही कारण आम्हाला माहित आहे की, आम्ही कसे खेळू शकतो. टी-20 क्रिकेटमध्ये नाणेफेक आणि परिस्थिती खूप महत्त्वाची असते. आम्हाला पुन्हा गती मिळाल्याने आनंद होत आहे.” मात्र भारतीय संघ पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध अशी कामगिरी करू शकला नाही याबद्दल कोहलीने खेद व्यक्त केला. तो म्हणाला, “त्या दोन सामन्यांमध्ये दोन षटकेदेखील सामना फिरवू शकली असती. मला आनंद आहे की आता सगळेच फॉर्ममध्ये आहेत.” कोहली म्हणाला की, “त्यांना स्कॉटलंडला 100-120 धावांपर्यंत रोखायचे होते.”

“आम्ही त्यांना इतक्या धावसंख्येवर रोखले की आम्ही इतर सर्व संघांना मागे टाकण्यात यशस्वी झालो. लवकरच उद्दिष्ट गाठण्याचे नियोजनही आम्ही केले होते. अतिरिक्त प्रयत्न टाळायचे असल्याने आम्ही आठ ते दहा षटकांचे लक्ष्य ठेवले होते,” असे विराट म्हणाला.

पाकिस्तान आणि न्यूझीलंडने गणित बिघडवलं

भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला (India vs Afghanistan) 66 धावांनी मात देत पहिला-वहिला विजय मिळवला. पण त्याहून तगडा विजय आज भारताने स्कॉटंलडला (India vs Scotland) 8 गडी राखून पराभूत करत मिळवला आहे. विशेष म्हणजे भारताने स्कॉटलंडला दिलेलं लक्ष्य केवळ 39 चेंडूत पूर्ण केल्याने गुणतालिकेतही भारत नेट रनेटमध्ये सर्वांच्या पुढे गेला आहे. पण केवळ 2 विजय खात्यात असल्याने तिसऱ्या स्थानावर सध्यातरी भारत आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला होता, त्यामुळे नेट रनरेटच्या बाबतीत भारत खूपच खाली घसरला होता. त्यामुळे भारतासाठी नंतरचे सर्व सामने करो या मरो असेच होते. त्यानुसार तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला मात दिली. पण तरीही नेटरनरेटमध्ये पुढे जाण्यासाठी भारताला मोठ्या विजयाची अपेक्षा आहे. जी अपेक्षा काल उत्तम गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीने भारताने पूर्ण केली आहे. आधी भेदक गोलंदाजीने भारताने स्कॉटलंडला 85 धावांमध्ये रोखलं. त्यानंतर सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी उत्तम सुरुवात केली. रोहित, राहुल बाद होताच अवघ्या 4 धावांची गरज सूर्यकुमारने षटकार ठोकत पूर्ण करत अवघ्या 6.3 षटकात संघाला विजय मिळवून दिला.

इतर बातम्या

T20 World Cup: स्कॉटलंडवर मोठा विजय तर मिळवला, पण भारताचं सेमीफायनलमध्ये पोहचणं अजूनही अवघड, असं आहे गणित

T20 World Cup: स्कॉटलंडविरुद्ध बुमराहने रचला इतिहास, विश्वविक्रम नावे करत बनला भारताचा ‘विकेट वीर’

T20 world cup 2021: भारताविरुद्ध अफगाणिस्तान पराभूत, पण सामन्यात मिळाला बुमराहसारखा गोलंदाज, पाहा VIDEO

(Wish we had couple of good overs against Pakistan and New Zealand, Virat Kohli expressed regret)

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.