AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्या दोन सामन्यांमधील पराभव विराटच्या जिव्हारी, म्हणाला, ‘ती दोन षटकं मिळायला हवी होती…’

2021 च्या T-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग दोन विजय मिळवले आहेत. या सामन्यांमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे टीम इंडियाने आपली निव्वळ धावगतीही (नेट रनरेट) सुधारली आहे.

पहिल्या दोन सामन्यांमधील पराभव विराटच्या जिव्हारी, म्हणाला, 'ती दोन षटकं मिळायला हवी होती...'
Virat Kohli
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 06, 2021 | 11:28 AM
Share

मुंबई : 2021 च्या T-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग दोन विजय मिळवले आहेत. या सामन्यांमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे टीम इंडियाने आपली निव्वळ धावगतीही (नेट रनरेट) सुधारली आहे. स्कॉटलंडला एकतर्फी पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध चांगला खेळ का केला नाही, याचा खेद कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध अशी काही चांगली षटके मिळू शकली नाहीत, असे विराट म्हणाला. (Wish we had couple of good overs against Pakistan and New Zealand, Virat Kohli expressed regret)

स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात भारताने विजयासाठी 6.3 षटकांत 86 धावांचे लक्ष्य गाठले. गेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव केला होता. पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पहिले दोन सामने गमावल्यानंतर आता उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या भारताच्या आशा अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर अवलंबून आहेत. यामध्ये अफगाणिस्तानने विजय मिळवला तर अंतिम-4 मध्ये पोहोचण्याच्या भारताच्या आशा बळकट होतील.

सामना संपल्यानंतर विराट कोहली म्हणाला, “ही चांगली कामगिरी होती. आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करत होतो. आजच्या सामन्याबद्दल जास्त काही बोलणार नाही कारण आम्हाला माहित आहे की, आम्ही कसे खेळू शकतो. टी-20 क्रिकेटमध्ये नाणेफेक आणि परिस्थिती खूप महत्त्वाची असते. आम्हाला पुन्हा गती मिळाल्याने आनंद होत आहे.” मात्र भारतीय संघ पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध अशी कामगिरी करू शकला नाही याबद्दल कोहलीने खेद व्यक्त केला. तो म्हणाला, “त्या दोन सामन्यांमध्ये दोन षटकेदेखील सामना फिरवू शकली असती. मला आनंद आहे की आता सगळेच फॉर्ममध्ये आहेत.” कोहली म्हणाला की, “त्यांना स्कॉटलंडला 100-120 धावांपर्यंत रोखायचे होते.”

“आम्ही त्यांना इतक्या धावसंख्येवर रोखले की आम्ही इतर सर्व संघांना मागे टाकण्यात यशस्वी झालो. लवकरच उद्दिष्ट गाठण्याचे नियोजनही आम्ही केले होते. अतिरिक्त प्रयत्न टाळायचे असल्याने आम्ही आठ ते दहा षटकांचे लक्ष्य ठेवले होते,” असे विराट म्हणाला.

पाकिस्तान आणि न्यूझीलंडने गणित बिघडवलं

भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला (India vs Afghanistan) 66 धावांनी मात देत पहिला-वहिला विजय मिळवला. पण त्याहून तगडा विजय आज भारताने स्कॉटंलडला (India vs Scotland) 8 गडी राखून पराभूत करत मिळवला आहे. विशेष म्हणजे भारताने स्कॉटलंडला दिलेलं लक्ष्य केवळ 39 चेंडूत पूर्ण केल्याने गुणतालिकेतही भारत नेट रनेटमध्ये सर्वांच्या पुढे गेला आहे. पण केवळ 2 विजय खात्यात असल्याने तिसऱ्या स्थानावर सध्यातरी भारत आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला होता, त्यामुळे नेट रनरेटच्या बाबतीत भारत खूपच खाली घसरला होता. त्यामुळे भारतासाठी नंतरचे सर्व सामने करो या मरो असेच होते. त्यानुसार तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला मात दिली. पण तरीही नेटरनरेटमध्ये पुढे जाण्यासाठी भारताला मोठ्या विजयाची अपेक्षा आहे. जी अपेक्षा काल उत्तम गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीने भारताने पूर्ण केली आहे. आधी भेदक गोलंदाजीने भारताने स्कॉटलंडला 85 धावांमध्ये रोखलं. त्यानंतर सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी उत्तम सुरुवात केली. रोहित, राहुल बाद होताच अवघ्या 4 धावांची गरज सूर्यकुमारने षटकार ठोकत पूर्ण करत अवघ्या 6.3 षटकात संघाला विजय मिळवून दिला.

इतर बातम्या

T20 World Cup: स्कॉटलंडवर मोठा विजय तर मिळवला, पण भारताचं सेमीफायनलमध्ये पोहचणं अजूनही अवघड, असं आहे गणित

T20 World Cup: स्कॉटलंडविरुद्ध बुमराहने रचला इतिहास, विश्वविक्रम नावे करत बनला भारताचा ‘विकेट वीर’

T20 world cup 2021: भारताविरुद्ध अफगाणिस्तान पराभूत, पण सामन्यात मिळाला बुमराहसारखा गोलंदाज, पाहा VIDEO

(Wish we had couple of good overs against Pakistan and New Zealand, Virat Kohli expressed regret)

Follow Us
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!