AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्या दोन सामन्यांमधील पराभव विराटच्या जिव्हारी, म्हणाला, ‘ती दोन षटकं मिळायला हवी होती…’

2021 च्या T-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग दोन विजय मिळवले आहेत. या सामन्यांमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे टीम इंडियाने आपली निव्वळ धावगतीही (नेट रनरेट) सुधारली आहे.

पहिल्या दोन सामन्यांमधील पराभव विराटच्या जिव्हारी, म्हणाला, 'ती दोन षटकं मिळायला हवी होती...'
Virat Kohli
| Edited By: | Updated on: Nov 06, 2021 | 11:28 AM
Share

मुंबई : 2021 च्या T-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग दोन विजय मिळवले आहेत. या सामन्यांमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे टीम इंडियाने आपली निव्वळ धावगतीही (नेट रनरेट) सुधारली आहे. स्कॉटलंडला एकतर्फी पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध चांगला खेळ का केला नाही, याचा खेद कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध अशी काही चांगली षटके मिळू शकली नाहीत, असे विराट म्हणाला. (Wish we had couple of good overs against Pakistan and New Zealand, Virat Kohli expressed regret)

स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात भारताने विजयासाठी 6.3 षटकांत 86 धावांचे लक्ष्य गाठले. गेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव केला होता. पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पहिले दोन सामने गमावल्यानंतर आता उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या भारताच्या आशा अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर अवलंबून आहेत. यामध्ये अफगाणिस्तानने विजय मिळवला तर अंतिम-4 मध्ये पोहोचण्याच्या भारताच्या आशा बळकट होतील.

सामना संपल्यानंतर विराट कोहली म्हणाला, “ही चांगली कामगिरी होती. आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करत होतो. आजच्या सामन्याबद्दल जास्त काही बोलणार नाही कारण आम्हाला माहित आहे की, आम्ही कसे खेळू शकतो. टी-20 क्रिकेटमध्ये नाणेफेक आणि परिस्थिती खूप महत्त्वाची असते. आम्हाला पुन्हा गती मिळाल्याने आनंद होत आहे.” मात्र भारतीय संघ पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध अशी कामगिरी करू शकला नाही याबद्दल कोहलीने खेद व्यक्त केला. तो म्हणाला, “त्या दोन सामन्यांमध्ये दोन षटकेदेखील सामना फिरवू शकली असती. मला आनंद आहे की आता सगळेच फॉर्ममध्ये आहेत.” कोहली म्हणाला की, “त्यांना स्कॉटलंडला 100-120 धावांपर्यंत रोखायचे होते.”

“आम्ही त्यांना इतक्या धावसंख्येवर रोखले की आम्ही इतर सर्व संघांना मागे टाकण्यात यशस्वी झालो. लवकरच उद्दिष्ट गाठण्याचे नियोजनही आम्ही केले होते. अतिरिक्त प्रयत्न टाळायचे असल्याने आम्ही आठ ते दहा षटकांचे लक्ष्य ठेवले होते,” असे विराट म्हणाला.

पाकिस्तान आणि न्यूझीलंडने गणित बिघडवलं

भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला (India vs Afghanistan) 66 धावांनी मात देत पहिला-वहिला विजय मिळवला. पण त्याहून तगडा विजय आज भारताने स्कॉटंलडला (India vs Scotland) 8 गडी राखून पराभूत करत मिळवला आहे. विशेष म्हणजे भारताने स्कॉटलंडला दिलेलं लक्ष्य केवळ 39 चेंडूत पूर्ण केल्याने गुणतालिकेतही भारत नेट रनेटमध्ये सर्वांच्या पुढे गेला आहे. पण केवळ 2 विजय खात्यात असल्याने तिसऱ्या स्थानावर सध्यातरी भारत आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला होता, त्यामुळे नेट रनरेटच्या बाबतीत भारत खूपच खाली घसरला होता. त्यामुळे भारतासाठी नंतरचे सर्व सामने करो या मरो असेच होते. त्यानुसार तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला मात दिली. पण तरीही नेटरनरेटमध्ये पुढे जाण्यासाठी भारताला मोठ्या विजयाची अपेक्षा आहे. जी अपेक्षा काल उत्तम गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीने भारताने पूर्ण केली आहे. आधी भेदक गोलंदाजीने भारताने स्कॉटलंडला 85 धावांमध्ये रोखलं. त्यानंतर सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी उत्तम सुरुवात केली. रोहित, राहुल बाद होताच अवघ्या 4 धावांची गरज सूर्यकुमारने षटकार ठोकत पूर्ण करत अवघ्या 6.3 षटकात संघाला विजय मिळवून दिला.

इतर बातम्या

T20 World Cup: स्कॉटलंडवर मोठा विजय तर मिळवला, पण भारताचं सेमीफायनलमध्ये पोहचणं अजूनही अवघड, असं आहे गणित

T20 World Cup: स्कॉटलंडविरुद्ध बुमराहने रचला इतिहास, विश्वविक्रम नावे करत बनला भारताचा ‘विकेट वीर’

T20 world cup 2021: भारताविरुद्ध अफगाणिस्तान पराभूत, पण सामन्यात मिळाला बुमराहसारखा गोलंदाज, पाहा VIDEO

(Wish we had couple of good overs against Pakistan and New Zealand, Virat Kohli expressed regret)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.