AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत या गोष्टी पहिल्यांदाच घडणार, भारतीय संघ 25 वर्षानंतर करणार असं काम

मेन्स टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या जेतेपदावर भारताने नाव कोरलं आहे. आता वुमन्स संघ पहिल्यांदा जेतेपद मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत भारताची एकदाही वर्ल्डकप जिंकलेला नाही. एकदा संधी चालून आली होती पण ऑस्ट्रेलियाने हिरावून घेतली. असं सर्व असताना या वर्ल्डकपमध्ये काही गोष्टी पहिल्यांदाच घडणार आहेत.

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत या गोष्टी पहिल्यांदाच घडणार, भारतीय संघ 25 वर्षानंतर करणार असं काम
| Updated on: Oct 02, 2024 | 6:14 PM
Share

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं असून पहिला सामना 3 ऑक्टोबरला होणार आहे. बांग्लादेश विरुद्ध स्कॉटलंड आणि पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना रंगणार आहे. पहिल्याच दिवशी दोन सामन्यांची मेजवाणी क्रीडारसिकांना मिळणार आहे. दोन्ही सामना शारजाहमध्ये होणार आहे. बांग्लादेश स्कॉटलंड सामना दुपारी 3 वाजता, तर पाकिस्तान श्रीलंका सामना संध्याकाळी 7.30 वाजता असणार आहे. दुसरीकडे, भारतीय महिला संघही या स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. स्पर्धेपूर्वीच्या सराव सामन्यात भारताने चमक दाखवली आहे. पहिल्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजला 20 धावांनी पराभूत केलं. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेला 28 धावांनी मात दिली. आता भारतीय संघ स्पर्धेच्या साखळी फेरीसाठी सज्ज झाला आहे. भारताचा पहिला सामना 4 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्याकडे भारतीय क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दहा संघ सहभागी झाले असून 5-5 चे दोन गट तयार केले आहेत. भारतीय संघ अ गटात असून यात न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आहे. भारतीय संघ साखळी फेरीतील शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी खेळणार आहे. हा सामना शारजाहमध्ये होणार आहे. हे मैदान दोन्ही देशांसाठी खास असणार आहे. कारण या मैदानावर दोन्ही संघ 25 वर्षांपूर्वी भिडले होते. तेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं वादळ घोंगावलं होतं. तेव्हा सचिन तेंडुलकरने 143 धावांची वादळी खेळी केली होती. आता या मैदानावर महिला संघ 25 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाशी सामना करणार आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील बरेचसे सामना दुबईत होणार आहे. यापूर्वी सर्व 10 संघांनी एकदाही दुबईत आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळलेला नाही. म्हणजेच दुबईत पहिल्याच या स्पर्धेचं आयोजन होणार आहे. तसेच या स्पर्धेत होम ग्राउंड असा काही फायदा नसेल. त्यामुळे दोन्ही संघाच्या खेळाडूंची कसोटी लागणार आहे.

दुसरीकडे, आयसीसीने महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी पावलं उचलली आहेत. आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेत महिलांनाही पुरुषांप्रमाणे बक्षिसी रक्कम मिळणार आहे. यापूर्वी बक्षिसाची रक्कम 1 मिलियन डॉलर होती. आता त्यात 134 टक्क्यांची वाढ करून 2.34 मिलियन डॉलर केली आहे.

साहेबांनी आमचे खूप लाड केले, पंकजा मुंडेंकडून वडिलांच्या आठवणीना उजाळा
साहेबांनी आमचे खूप लाड केले, पंकजा मुंडेंकडून वडिलांच्या आठवणीना उजाळा.
एकनाथ शिंदेंचा थेट शरद पवार यांना फोन अन् दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
एकनाथ शिंदेंचा थेट शरद पवार यांना फोन अन् दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तोडगा निघाला... सर्व महापालिका मुहायुती एकत्र लढणार, बैठकीत काय ठरलं?
तोडगा निघाला... सर्व महापालिका मुहायुती एकत्र लढणार, बैठकीत काय ठरलं?.
आरशात पाहावं...उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपच्या बड्या नेत्याचं उत्तर
आरशात पाहावं...उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपच्या बड्या नेत्याचं उत्तर.
आता खुराक सुरु करू? दादांचं नेत्यांच्या त्या मागणीवर मिश्कील उत्तर
आता खुराक सुरु करू? दादांचं नेत्यांच्या त्या मागणीवर मिश्कील उत्तर.
काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन
काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन.
'कुंभमेळासाठी येणारे साधू संत जंगलात राहणारे असतात ते काय झाडावर...'
'कुंभमेळासाठी येणारे साधू संत जंगलात राहणारे असतात ते काय झाडावर...'.
डोळे फुटले नाही आमचे, वडेट्टीवार सभागृहातच भडकले, नेमकं घडलं काय?
डोळे फुटले नाही आमचे, वडेट्टीवार सभागृहातच भडकले, नेमकं घडलं काय?.
भाजपचे मुनगंटीवार विरोधकांचे 'भाऊ'? सत्तेत असूनही सरकारला घरचा आहेर
भाजपचे मुनगंटीवार विरोधकांचे 'भाऊ'? सत्तेत असूनही सरकारला घरचा आहेर.
कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडांची कत्तल, रामटेकडीची झाडं तोडून लपवली?
कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडांची कत्तल, रामटेकडीची झाडं तोडून लपवली?.