AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने सेमीफायनल, फायनलचे मुंबईत किती सामने जिंकलेत? संजय राऊत यांच्या दाव्यात किती तथ्य?

World cup final 2023 | वर्ल्ड कप फायनल अहमदाबादऐवजी मुंबईत खेळवायला हवी होती, अशी चर्चा सोशल मीडियानवर सुरु आहे. अहमदाबाद अनलकी आणि मुंबई लकी असा सूर या चर्चेचा आहे. पण आतापर्यंत टीम इंडियाचे वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल, फायनलचे किती सामने मुंबईत झालेत? त्यापैकी किती जिंकले? यावर एक नजर मारा.

भारताने सेमीफायनल, फायनलचे मुंबईत किती सामने जिंकलेत? संजय राऊत यांच्या दाव्यात किती तथ्य?
World cup 2023
| Updated on: Nov 24, 2023 | 10:21 AM
Share

World cup final 2023 | सलग 10 सामने जिंकणारी टीम इंडिया फायनलमध्ये अडखळली. वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 6 विकेटने हरवलं. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक उंचावला. या पराभवामुळे पुन्हा एकदा टीम इंडियाच विश्वचषक जिंकण्याच स्वप्न अपूर्ण राहिलं. खराब खेळ हे टीम इंडियाच्या पराभवाच कारण आहे. पण देशात एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. अनेक मोठ्या नेत्यांचा दावा आहे की, अहमदाबादऐवजी मुंबई किंवा कोलकातामध्ये फायनल झाली असती, तर टीम इंडियाने किताब जिंकला असता.

वर्ल्ड कप 2023 चा फायनल सामना रविवारी 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्सने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी स्वीकारली. टीम इंडियाने पहिली बॅटिंग करताना फक्त 240 धावाच केल्या. संपूर्ण टीम ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य फक्त 43 ओव्हर्समध्ये 4 विकेट गमावून पार केलं.

ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?

खराब खेळ हे टीम इंडियाच्या पराभवाच कारण आहे. पण भारतात यावरुन राजकारण सुरु झालं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, फायनल कोलकात किंवा मुंबईत असती, तर टीम इंडिया जरुर जिंकली असती. शिवसेना नेते संजय राऊत सुद्धा हेच म्हणाले, भारत-ऑस्ट्रेलिया फायनल अहमदाबादऐवजी मुंबईत झाली असती, तर टीम इंडिया चॅम्पियन बनली असती.

नॉकआऊट सामन्यांचा रेकॉर्ड काय सांगतो?

एखाद्या मैदानावर सामना खेळल्यामुळे किती फरक पडतो, हे सांगण कठीण आहे. पण इतिहासात तुम्ही डोकावू शकता. मागच्या 3-4 दशकात भारतात मोठ्या ICC स्पर्धांच आयोजन झालं आहे. सुरुवातीपासूनच मोठे सामने मुंबई, कोलकात्ता, दिल्ली आणि चेन्नई सारख्या शहरात खेळवले जायचे. ICC टुर्नामेंटसमधील नॉकआऊट सामन्यांचा रेकॉर्ड पाहिला, तर भारताला कधी यश मिळालय, कधी अपयश.

1987 मध्ये वानखेडेवर काय झालेलं?

1987 मध्ये भारतात पहिल्यांदा वर्ल्ड कप स्पर्धेत आयोजन झालं होतं. त्यावेळी भारत आणि इंग्लंडमध्ये सेमीफायनल मुकाबला झाला होता. वानखेडे स्टेडियमवर ही सेमीफायनलची मॅच होती. टीम इंडियाला त्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेला. त्यानंतर 1996 साली भारतात वनडे वर्ल्ड कपच आयोजन झालं. त्यावेळी श्रीलंकेविरुद्ध सेमीफायनलचा सामना होता. कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर ही मॅच झाली. त्यावेळी सुद्दा टीम इंडियाचा पराभव झालेला.

त्यावेळी अहमदाबादमध्ये जिंकलेलो

2006 साली भारतात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा झाली. त्यावेळी टीम इंडियाच आव्हान ग्रुप स्टेजमध्येच संपलं होतं. 2011 मध्ये भारतात पुन्हा वनडे वर्ल्ड कप झाला. त्यावेळी टीम इंडिया चॅम्पियन बनली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर फायनलचा सामना झाला. टीम इंडियाने श्रीलंकेला नमवून फायनल जिंकली. त्याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध अहमदाबादमध्ये क्वार्टर फायनलचा सामना खेळला गेला. ती मॅच जिंकून टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली होती.

T20 वर्ल्ड कप वानखेडेवर सेमीफायनलमध्ये काय झालेलं?

2016 साली T20 वर्ल्ड कप झाला. भारत यजमान होता. टीम इंडियाचा तेव्हा सुद्धा सेमीफायनलमध्येच पराभव झाला होता. वानखेडेवर झालेल्या सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजने हरवलं होतं. आता 2023 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवलं.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?