WTC 2021 : 2019 वर्ल्ड कप सेमी फायनलचा बदला घेणार का टीम इंडिया?, पाहा काय घडलं होतं त्या दिवशी..!

World Test Championship Final 2021 : अगदी काही तासांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताची गाठ पडणार आहे न्यूझीलंडशी... ज्या न्यूझीलंडने 2019 साली झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताला पराभवाचा धक्का दिला आणि करोडो भारतीयांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला...!

WTC 2021 : 2019 वर्ल्ड कप सेमी फायनलचा बदला घेणार का टीम इंडिया?, पाहा काय घडलं होतं त्या दिवशी..!
WTC Final
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 12:04 PM

मुंबई : अगदी काही तासांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात (World Test Championship Final 2021) भारताची गाठ पडणार आहे न्यूझीलंडशी… (India vs New Zealand) ज्या न्यूझीलंडने 2019 साली झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताला पराभवाचा धक्का दिला आणि करोडो भारतीयांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला त्याच किवींच्या चमूशी आता भारताला भिडायचं आहे. ही लढत साऊथॅम्प्टनच्या हॅम्पशायर बाऊलच्या क्रिकेट ग्राऊंडवर खेळविण्यात येतीय. या लढतीत भारताला 2019 च्या वर्ल्ड कपमधल्या पराभवाचा बदला घेण्याची नामी संधी आहे. 2013 पासून भारतीय संघाला आयसीसीचा पुरस्कार जिंकता आलेला नाहीय. आता विराटच्या नेतृत्वाखालील संघाला साऊथॅम्प्टनच्या हॅम्पशायर बाऊलच्या बाल्कनीत जग्गजेतेपदाची गदा उंचावण्याची संधी आहे.  (World Test Championship Final 2021 Will Team India avenge the World Cup semi final 2019)

विराटने स्वप्न पाहिलं पण…

2019 चा वर्ल्डकप मध्ये शानदार प्रदर्शन करून भारतीय संघाने सेमी फायनल मध्ये जागा मिळवली होती. फक्त दोन मॅच खेळायच्या आणि आयसीसीच्या जगज्जेतेपदाच्या करंडक उंचवायचा हे स्वप्न विराट कोहलीने पाहिलं होतं. परंतु विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने सेमी फायनलच्या सामन्यात भारताचा धुव्वा उडवला.

महेंद्रसिंग धोनीची क्रिकेट करियर मधली ही शेवटची मॅच ठरली. धोनी यानंतर निळ्या जर्सी मध्ये खेळलेला दिसलाच नाही शेवटी त्याने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुड बाय केलं.

काय झालं होतं सेमीफायनल सामन्यात…?

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान ही मॅच 9 जुलै 2019 ला मॅंचेस्टर येथे खेळली गेली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना आठ विकेट गमावून 239 धावा केल्या. संघाचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर 90 चेंडूंमध्ये तीन चौकार आणि एका षटकारासह मदतीने 74 धावा केल्या तर केन विल्यमसनने 95 चेंडूत 67 जणांची खेळी केली. या खेळीला त्याने सहा चौकारांचा साज चढवला. भारताकडून भुवनेश्वर कुमारने 3 विकेट घेतल्या. न्यूझीलंडने केलेला स्कोर काही मोठा नव्हता. परंतु सामन्यादरम्यान थोडासा पाऊस पडून गेला आणि हाच या मधला टर्निंग पॉइंट ठरला.

भारताला या स्कोरचा पाठलाग करणं मुश्किल होऊन बसलं. भारताने आपल्या तीन विकेट्स फक्त 5 धावांवर गमावल्या. यानंतर 92 रुग्णांवर सहा विकेट गेल्या. नंतर रवींद्र जडेजा आणि एम एस धोनीने सामना शेवटपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय संघाचा 18 रन्सने या मॅचमध्ये पराभव झाला. या सामन्यात भारताकडून जडेजाने सर्वाधिक 77 रन्स केले. 59 बॉल मध्ये त्याने चार षटकार आणि चार चौकार लगावले. याशिवाय महेंद्रसिंग धोनीने 72 बॉलमध्ये एक चौकार आणि एका षटकारासह मदतीने 50 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री याने भारतीच्या 3 फलंदाजांना तंबूत पाठवलं.

(World Test Championship Final 2021 Will Team India avenge the World Cup semi final 2019)

हे ही वाचा :

WTC Final 2021 : टॉस जिंकल्यावर भारताने बॅटिंग करावी की फिल्डिंग?, गांगुलीचा विराटला महत्त्वाचा सल्ला

WTC Final India vs New Zealand live streaming : भारत विरुद्ध न्यूझीलंड, सामना कुठे आणि कधी? या ठिकाणी पाहा Live

WTC Final 2021 : बुमराहची सामन्याअगोदर बायको संजनाला मुलाखत, ‘तो’ प्रश्न विचारताच लाजेने चुर्रर्र झाला!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.