AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2025: दिल्लीला पराभूत करत गुजरात जायंट्सचा मुंबईला दणका, गुणतालिकेत अशी झाली उलथापालथ

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. आता साखळी फेरीतील शेवटचे काही सामने शिल्लक आहेत. दिल्ली कॅपिटल्सने आठही सामने खेळले असून गुणतालिकेत 10 गुणांसह अव्वल स्थानी आहे. गुजरातविरुद्धच्या पराभवामुळे थेट अंतिम फेरीचं स्वप्न मात्र भंगलं आहे.

WPL 2025: दिल्लीला पराभूत करत गुजरात जायंट्सचा मुंबईला दणका, गुणतालिकेत अशी झाली उलथापालथ
वुमन्स प्रीमियर लीगImage Credit source: Mumbai Indians Twitter
| Updated on: Mar 07, 2025 | 11:15 PM
Share

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील 17वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्ससमोर विजयासाठी 178 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान गुजरात जायंट्सने 19.3 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह गुजरात जायंट्सने टॉप 3 मधील स्थान पक्कं करण्याच्या दिशेने कूच केली आहे. दिल्ली कॅपिटल्स साखळी फेरीत आठ पैकी आठ सामने खेळली आहे. यात 5 सामन्यात विजय तर तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. दिल्ली कॅपिटल्सचे गुणतालिकेत 10 गुण असून +0.396 नेट रनरेटसह अव्वल स्थानी आहे. तर गुजरात जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुणतालिकेत उलथापालथ केली आहे. तिसऱ्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. गुजरात आणि मुंबई इंडियन्सचे सारखेच गुण आहेत. मात्र रनरेटच्या बाबतीत गुजरात सरस ठरली आहे. गुजरात जायंट्स संघ 7 सामने खेळला असून 4 सामन्यात विजय आणि 3 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर नेट रनरेट हा +0.334 इतका आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सला अजूनही साखळी फेरीत दोन सामने खेळायचे आहेत. मुंबई इंडियन्स 6 सामने खेळली असून 4 सामन्यात विजय आणि दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. खरं तर मुंबई इंडियन्सला थेट अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. कारण सध्या गुणतालिकेत 8 गुण असून उर्वरित दोन सामने जिंकले तर थेट 12 गुण होतील. पण असं असलं तरी गुजरात आणि दिल्लीच्या सामन्यानंतर दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

आरसीबीचं गणित आता जर तर वर आहे. उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवला तरी 8 गुण होतील. पण तिथेही नेट रनरेट चांगला असेल आणि गुजरात आणि मुंबईने शेवटचे सर्व सामने गमावले तर संधी मिळू शकते. अन्यथा खूपच कठीण आहे. दुसरीकडे युपी वॉरियर्सचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. या स्पर्धेतील शेवटचा सामना हा औपचारिक असणार आहे.

Follow Us
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय