AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात होणार WTC Final? असं आहे समीकरण

India vs Pakistan Wtc Final Scenario: टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघ आयसीसीच्या स्पर्धेत आमनेसामने येतात. आता या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या तिसऱ्या साखळीतील अंतिम सामना होऊ शकतो का? त्याचं समीकरण आपण जाणून घेऊयात.

IND vs PAK: टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात होणार WTC Final? असं आहे समीकरण
team india pakistan babar azam
| Updated on: Aug 19, 2024 | 12:22 AM
Share

टीम इंडिया सलग 2 वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप स्पर्धेच्या गदेने हुलकावणी दिली. टीम इंडियाला 2021 साली न्यूझीलंड विरुद्ध अंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागलं. तर त्यानंतर 2023 साली ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात टीम इंडियावर मात केली. आता सध्या टीम इंडिया या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या तिसऱ्या साखळीतील क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसर्‍या स्थानी आहे. तर टीम इंडियाचा पारंपरिक आणि कट्टर प्रतिस्पर्धी सातव्या स्थानी आहे. मात्र त्यानंतरही क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा महामुकाबला व्हावा, अशी आशा आहे. हे शक्य आहे का? पाकिस्तानला फायनलसाठी किती सामने जिंकावे लागतील? त्याचं समीकरण जाणून घेऊयात.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील तिसऱ्या साखळीत पाकिस्तान आणखी 9 सामने खेळणार आहे. पाकिस्तानने या 9 पैकी 7 सामने जिंकले, तर ते अंतिम फेरीत पोहचू शकतात. मात्र पाकिस्तानने 2 पैकी अधिक सामने गमावले, तर त्यांचं अंतिम फेरीत पोहचण्याचं स्वप्न पुन्हा भंग होऊ शकतं. तसेच पाकिस्तानने 9 पैकी 6 सामने जिंकले, 2 सामने अनिर्णित राहिले आणि 1 गमवला तरीही ते अंतिम फेरीत पोहचू शकतात. मात्र पाकिस्तानने 2 सामने गमावले आणि 1 मॅच ड्रॉ राहिली तर शेजाऱ्यांसाठी जर तरची स्थिती असेल.

टीम इंडियाचं समीकरण

टीम इंडियाला आतापर्यंत या तिसऱ्या साखळीत 10 सामने खेळायचे आहेत. टीम इंडियाने 10 पैकी 7 सामने जिंकले तर अंतिम फेरीत प्रवेश करेल. मात्र टीम इंडियाने 3 पेक्षा अधिक सामने गमावले, तर अंतिम फेरीत पोहचण्याची हॅटट्रिक हुकेल.

टीम इंडिया नंबर 1

टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी

टीम इंडियाने या साखळीतील 10 पैकी 6 सामने जिंकले तर 2 सामने गमावले आणि 2 सामने बरोबरीत सोडवण्यात यश आलं, तरीही रोहितसेना फायनलमध्ये पोहचेल. तसेच टीम इंडियाने 5 सामने जिंकले, 3 गमावले आणि 2 अनिर्णित राहिले, अशा परिस्थितीत रोहितसेनेला इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागेल. या सर्व जरतरचं समीकरण जुळून आले, तरच टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात अंतम सामना होऊ शकतो.

मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.