AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2025 : कसोटीत न्यूझीलंडची दक्षिण अफ्रिकेवर 281 धावांनी मात, ऑस्ट्रेलिया आणि भारताला बसला मोठा फटका

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमुळे प्रत्येक कसोटी सामन्याला महत्त्व आलं आहे. नुकताच पार पडलेल्या न्यूझीलंड दक्षिण अफ्रिका सामन्याचाही असाच परिणाम दिसून आला आहे. इंग्लंडला पराभूत करून भारताने दुसरं स्थान गाठलं होतं. पण न्यूझीलंडच्या विजयामुळे ऑस्ट्रेलिया भारत या दोन्ही संघांना फटका बसला आहे.

WTC 2025 : कसोटीत न्यूझीलंडची दक्षिण अफ्रिकेवर 281 धावांनी मात, ऑस्ट्रेलिया आणि भारताला बसला मोठा फटका
WTC 2025 : न्यूझीलंडची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठी झेप, भारत ऑस्ट्रेलियाचं झालं मोठं नुकसान
| Updated on: Feb 07, 2024 | 3:18 PM
Share

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर प्रत्येक कसोटी सामन्यानंतर फरक दिसून येत आहे. एका पराभव, ड्रा आणि विजय सर्वच गणित पालथून टाकतो. न्यूझीलंड दक्षिण अफ्रिका यांच्यातील सामन्याने असाच फरक पडला आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामना न्यूझीलंडने जिंकला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला होता. पण त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातच गणित फसलं. न्यूझीलंडने पहिल्या डावात 511 धावांची खेळी केली. तसेच दक्षिण अफ्रिकेला 162 धावांवर रोखलं. त्यामुळे पहिल्या डावात 449 धावांची आघाडी घेतली. तसेच दुसऱ्या डावात 4 गडी बाद 179 धावा करत डाव घोषित केला. न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेला 528 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठणं तसं अशक्यप्राय होतं. दक्षिण अफ्रिकेचा संपूर्ण संघ 247 धावांवर बाद झाला आणि न्यूझीलंडने 281 धावांनी विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पहिलं स्थान गाठलं आहे. तर भारत ऑस्ट्रेलिया यांना फटका बसला आहे.

न्यूझीलंडने आतापर्यंत एकूण 3 कसोटी सामने खेळले असून एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे दोन सामन्यातील विजयामुळे विजयी टक्केवारी ही 66.66 इतकी झाली आहे. तर ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 10 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात 6 सामन्यात विजय, तीन सामन्यात पराभव तर एक सामना ड्रा झाला आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी 55 टक्के आहे. त्यामुळे दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. तर भारताने इंग्लंडला दुसऱ्या सामन्यात पराभूत केल्याने विजयी टक्केवारी 52.77 इतकी झाली असून तिसरं स्थान गाठलं आहे.

WTC_Point_Table (3)

बांगलादेश 50 टक्के विजयी टक्केवारीसह चौथ्या, पाकिस्तान 36.66 टक्क्यांसह पाचव्या, वेस्ट इंडिज 33.33 टक्क्यांसह सहाव्या, दक्षिण अफ्रिका 33.33 टक्क्यांसह सातव्या, इंग्लंड 25 टक्क्यांसह आठव्या, तर श्रीलंक 0 टक्क्यांसह सर्वात शेवटी आहे.

न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 13 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या सामन्यातील निकाल पुन्हा गुणतालिकेवर प्रभाव पाडेल. भारत इंग्लंड यांच्यात तीन कसोटी सामने शिल्लक आहेत. या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा मार्ग मोकळा होईल.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...