AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final 2023 | वर्ल्ड टेस्ट महाअंतिम सामन्यात पराभव, रोहित शर्मा याची मोठी घोषणा, म्हणाला…

Rohit Sharma | टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध रोहित शर्मा याच्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागंल. त्यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?

WTC Final 2023 | वर्ल्ड टेस्ट महाअंतिम सामन्यात पराभव, रोहित शर्मा याची मोठी घोषणा, म्हणाला...
| Updated on: Jun 13, 2023 | 5:47 PM
Share

मुंबई | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 444 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा 234 धावांवर बाजार उठला. टीम इंडियाचा 209 धावांनी लाजिरवाणा पराभव झाला. टीम इंडियाचं सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं. सोबतच आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा आणखी वाढली. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने मोठी घोषणा केली आहे. रोहित शर्मा नक्की काय म्हणालाय, हे जाणून घेऊयात.

रोहित शर्मा काय म्हणाला?

रोहितने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायलनमधील पराभवानंतर आगामी एकदिवसीय वनडे वर्ल्ड कप 2023 बाबत प्रतिक्रिया दिली आहे. रोहितने या वनडे वर्ल्ड कपसाठी रणनिती निश्चित करावी लागेल, असं म्हटलंय.

“ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत आम्ही वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करु. आम्ही सहकाऱ्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य देऊ. तसेच आम्हाला हा सामना जिंकायचाय असं अजिबात विचार करणार नाही. हा सामना महत्वाचा आहे, ही स्पर्धा महत्वाची आहे असं आम्ही विचार करतो. यामुळे अनुकूल निकाल लागत नाहीय”, असं रोहित म्हणाला.

“तसेच आता आम्हाला वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल आणि रणनिती आखावी लागेल. आता आमचं लक्ष काही वेगळं करण्यावर असायला हवं. तसेच आम्ही खेळाडूंना बिंधास्तपणे खेळायला सांगितलं. हा स्पष्ट मेसेज आहे. टेस्ट असो टी 20 असो किंवा वनडे. आम्हाला दबावात खेळायचं नाहीये.”, असं रोहितने स्पष्ट केलं.

“जर तुम्ही पाहिलं असेल तर मी आणि शुबमन गिल याने दुसऱ्या डावात सुरुवात केली. ऑस्ट्रेलियावर दबाव टाकण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यामुळे आम्ही पहिल्या 10 ओव्हरमध्ये 60 धावा केल्या. अशा पद्धतीने खेळल्यास आऊट होण्याचाही धोका असतो”, असंही रोहितने नमूद केलं.

“लोकं म्हणतात की तुमची एकाग्रता भंग झाली, असं नाहीये. विषय इतकाचे की आम्ही वेगळ्या पद्धतीने खेळू इच्छितो. आम्ही बरेच आयसीसी स्पर्धा खेळलो पण जिंकलो नाहीत. आमचा प्रयत्न काही वेगळं करण्याचं आहे”, असं रोहितने म्हटलं.

Follow Us
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......