AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND VS ENG : इंग्लंडचा संघ 284 धावांवर गारद, टीम इंडियाची आघाडी 150 पार

जर भारताने हा सामना जिंकला किंवा तो अनिर्णित ठेवला तर 15 वर्षानंतर इंग्लिश भूमीवर कसोटी मालिका जिंकण्यात तो यशस्वी ठरेल. भारतीय संघाने शेवटची कसोटी मालिका 2007 मध्ये जिंकली होती.

IND VS ENG : इंग्लंडचा संघ 284 धावांवर गारद, टीम इंडियाची आघाडी 150 पार
इंग्लंडचा संघ 284 धावांवर गारद, टीम इंडियाची आघाडी 150 पार Image Credit source: TV9
| Updated on: Jul 03, 2022 | 9:26 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीचा तिसरा दिवस सुरू आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात 416 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ (England Team) 284 धावांत गारद झाला. दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराब झाली. शुभमन गिलला पहिल्याच षटकात जेम्स अँडरसनने बाद केले. त्याने 3 चेंडूत 4 धावा केल्या. चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी क्रीजवर आहेत. पहिल्या डावाच्या आधारे टीम इंडिया (Team India)ची आघाडी 150+ झाली आहे. इंग्लंडकडून पहिल्या डावात जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 106 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजने 4 विकेट (Wicket) घेतल्या.

बेअरस्टोचे 11 वे शतक, शमीने केले आऊट

इंग्लंडकडून उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या जॉनी बेअरस्टोने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 11 वे शतक झळकावले. त्याने 140 चेंडूंत 106 धावा केल्या. यादरम्यान त्याने 14 चौकार आणि 2 षटकार मारले. बेअरस्टोला मोहम्मद शमीने बाद केले आणि त्याचा झेल विराट कोहलीने टिपला. बेअरस्टोचे कसोटी क्रिकेटमधील हे सलग तिसरे शतक आहे. यापूर्वी त्याने न्यूझीलंडविरुद्ध 136 आणि 162 धावा केल्या होत्या. 2022 मध्ये या इंग्लंडच्या फलंदाजाने 5 शतके झळकावली आहेत.

शार्दुल ठाकूरला मोठे यश

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला शार्दुल ठाकूरने बाद केले. स्टोक्सला शार्दुलचा चेंडू मिडऑफ सीमापार पाठवायचा होता, पण जसप्रीत बुमराहने त्याचा शानदार झेल घेतला. स्टोक्सने 36 चेंडूत 25 धावा केल्या. याआधी शार्दुल ठाकूरनेही मोहम्मद शमीच्या चेंडूवर स्टोक्सचा सोपा झेल सोडला होता.

विराट बेअरस्टोची झुंज

इंग्लंडच्या डावात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात वादावादी झाली. कोहली स्लिपमध्ये उभा राहून बेअरस्टोला स्लेज करत होता. दरम्यान, बेअरस्टो संतापला आणि त्याने विराटवर ओरडण्यास सुरुवात केली. कोहलीनेही इंग्लंडच्या फलंदाजाला प्रत्युत्तर दिले. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पहिल्या डावात 400+ धावा करण्याची भारताची ही 17 वी वेळ

बर्मिंगहॅम मैदानावर पहिल्या डावात 400+ धावा करण्याची भारताची ही 17 वी वेळ आहे. इतक्या धावा करून आजपर्यंत एकही संघ हरलेला नाही. यापूर्वी, 16 पैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 8 वेळा विजय मिळवला होता तर 8 सामने अनिर्णित राहिले होते. जर भारताने हा सामना जिंकला किंवा तो अनिर्णित ठेवला तर 15 वर्षानंतर इंग्लिश भूमीवर कसोटी मालिका जिंकण्यात तो यशस्वी ठरेल. भारतीय संघाने शेवटची कसोटी मालिका 2007 मध्ये जिंकली होती. (England were bowled out for 284 in the third Edgbaston Test)

मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर.
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी.
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती....
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात.
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?.
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर.
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?.
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य.