AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धचा प्रत्येक सामना हरणार; सांगितलं कारण

पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 66 धावांनी मात केली. त्यामुळे 3 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

IND vs AUS : इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धचा प्रत्येक सामना हरणार; सांगितलं कारण
| Updated on: Nov 28, 2020 | 7:55 AM
Share

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) या संघांमध्ये (Ind Vs Aus 2020) शुक्रवारी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 66 धावांनी मात केली. त्यामुळे 3 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला 375 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र निर्धारित 50 षटकांमध्ये भारताला 8 विकेट्स गमावून 308 धावाच करता आल्या. या सामन्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन म्हणाला की, विराट कोहलीची टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तिन्ही प्रकारच्या मालिकांमध्ये पराभूत होईल. (Former England captain Michael Vaughan feels India will lose to Australia in all formats)

वॉनने शुक्रवारी एक ट्विट केलं, त्यात म्हटलंय की, “मला असं वाटतं की भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सर्व मालिकांमध्ये अत्यंत वाईट पद्धतीने पराभूत होईल”. वॉनला पाच गोलंदाजांसह मैदानात उतरणारा संघ आवडत नाही. ही जुनी मानिसिकता त्याला पटत नाही. त्याने म्हटलंय की, भारतीय संघ मला जुनी रणनीति फॉलो करणारा वाटला. भारताकडे केवळ पाच गोलंदाजांचा पर्याय आहे आणि भारताची फलंदाजी फार बरी नाही. भारताला 50 षटकं गोलंदाजी करण्यासाठी चार तासांहून अधिक वेळ लागला, मला हेदेखील आवडलेलं नाही. भारतीय संघाने काल बचावात्मक धोरण स्वीकारले होते. त्यांचं क्षेत्ररक्षणही फार बरं नाही. गोलंदाजी सामान्य आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियन संघ मात्र जबरदस्त आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात 375 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय चांगली झाली होती. सुरुवातीच्या पाच ओव्हरमध्ये भारताने 50 रन्स केल्या. परंतु नंतर लागोपाठ विकेट्स पडत असताना शिखर धवन आणि हार्दिक पांड्याने भारताचा डाव सावरला. शिखर धवनने 86 चेंडूत 74 धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने बहारदार खेळी करताना 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 76 चेंडूत 90 धावा फटकावल्या. या दोघांव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारताचे स्टार फलंदाज या सामन्यात सपशेल अपयशी ठरले. त्यामुळेच भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला. कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर हे महत्त्वाचे फलंदाज त्यांच्या नावाला साजेसा खेळ करु शकले नाहीत. आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा काढणाऱ्या मयांक अग्रवालने आक्रमक सुरुवात केली होती, परंतु त्याला मोठी खेळी करता आली आहे. मयांक 22, कोहली 21, श्रेयस 2, तर राहुल 12 धावा काढून तंबूत परतले. परिणामी भारताने कांगारुंविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना गमावला.

या सामन्यात धवन-पांड्याव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय फलंदाजांला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू अ‌ॅडम झॅम्पाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या तर जोश हेजलवूडने 3 घेऊन त्याला सुंदर साथ दिली. मायकल स्टार्कने 1 विकेट घेतली. झॅम्पाने उत्कृष्ट गोलंदाजी केली.

तत्पूर्वी, सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधार अ‌ॅरॉन फिंचचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सार्थ ठरवला. कर्णधार अ‌ॅरॉन फिंच आणि स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) या जोडीने दमदार शतके झळकावली तर ग्लेन मॅक्सवेलने तुफानी खेळी करत 19 चेंडूत 45 धावा फटकावल्या, तसेच सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनेही अर्धशथक झळकावलं. फिंच-वॉर्नर-स्मिथ आणि मॅक्सवेलच्या दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 375 धावांचा डोंगर उभा केला. भारतीय संघाला हे आव्हान पेलवता आलं नाही.

संबंधित बातम्या

IND vs AUS: स्मिथने करुन दाखवलं; भारताविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात केला ‘हा’ दणदणीत रेकॉर्ड!

रोहित शर्माच्या दुखापतीवरुन गोंधळाचे वातावरण; विराट कोहलीची नाराजी

रात्रभर जागून BCCI चे नटराजन-इशांतबाबत मोठे निर्णय, रोहितच्या फिटनेसबाबत महत्त्वाची अपडेट

(Former England captain Michael Vaughan feels India will lose to Australia in all formats)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.