AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dinesh Karthik : दिनेश कार्तिकला महेंद्रसिंग धोनीने दिला होता सल्ला, त्याचा आजही त्याला फायदा होतो

टी-20 पहिले अर्धशतक झळकावणारा दिनेश कार्तिक सामना संपल्यानंतर मैदानावर बसला आणि हार्दिक पांड्या त्याची मुलाखत घेतली. त्यावेळी तिथं अनेक गोष्टींचा उलघडा झाला. सध्या सुरू असलेल्या मालिकेत पांड्या भारतीय संघाचा उपकर्णधार आहे.

Dinesh Karthik : दिनेश कार्तिकला महेंद्रसिंग धोनीने दिला होता सल्ला, त्याचा आजही त्याला फायदा होतो
मुलाखतीदरम्यान हार्दिकने त्याच्या मानसिकतेबद्दल कार्तिकला प्रश्न विचारलाImage Credit source: twitter
| Updated on: Jun 19, 2022 | 8:50 AM
Share

मुंबई – राजकोट (Rajkot) येथे चौथ्या टी20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 82 धावांनी विजय मिळविला. मॅचमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यानंतर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सामनावीर दिनेश कार्तिकशी (Dinesh Karthik) संवाद साधला. त्यावेळी माजी कर्णधार एमएस धोनीला बाबत दिनेश कार्तिक म्हणाला की, स्वत:च्या खेळापेक्षा संघाला काय अपेक्षित आहे, यावर लक्ष केंद्रीत करायला हवे असं सांगितलं. दोघांच्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. “माझ्या सुरुवातीच्या काळात मी माही भाईला एक प्रश्न विचारला होता. मी त्याला विचारले की तो दबावाच्या काळात कसा खेळतो. त्यावेळी त्याने मला एक साधा सल्ला दिला होता. तुमच्या स्वतःच्या स्कोअरबद्दल विचार करणे थांबवा आणि तुमच्या संघाला काय हवे आहे याचा विचार करा’. अगदी सुरुवातीपासूनच, हा धडा माझ्या मनात अडकला आहे. मी आता ज्या प्रकारचा खेळाडू आहे ते बनण्यास मला मदत केली” असल्याचे कार्तिकने सांगितले.

मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

टी-20 पहिले अर्धशतक झळकावणारा दिनेश कार्तिक सामना संपल्यानंतर मैदानावर बसला आणि हार्दिक पांड्या त्याची मुलाखत घेतली. त्यावेळी तिथं अनेक गोष्टींचा उलघडा झाला. सध्या सुरू असलेल्या मालिकेत पांड्या भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या दोन क्रिकेटपटूंच्या संभाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. मुलाखतीदरम्यान हार्दिकने कार्तिकला त्याची अर्धशतकी खेळी आणि भारतीय संघात पुनरागमन करण्याबाबत अनेक प्रश्न विचारले आहेत.

फलंदाजी करताना मानसिकता असते?

मुलाखतीदरम्यान हार्दिकने त्याच्या मानसिकतेबद्दल कार्तिकला प्रश्न विचारला. त्यावेळी कार्तिक म्हणाला, ‘मध्यम फळीतील फलंदाजाला परिस्थितीनुसार वेगवेगळ्या वेळेला वेगळ्यावेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. तुम्ही कोणाला टार्गेट करता आणि तुमचा डाव कसा पुढे कसा न्यायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे. मॅच रंगात आल्यानंतर मला कळलं की पुढे काय करायचं? ही एक महत्त्वाची भागीदारी होती. मालिकेत 1-2 अशी घसरण झाल्यानंतर बरोबरीत येणे खूप महत्त्वाचे होते असं कार्तिक म्हणाला.

तसेच मी माझ्या खेळीचा आनंद लुटला आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.