Gautam Gambhirl : खुर्चीतून उठला आणि…. बाऊंड्रीवर अक्षर पटेलचा ‘कारनामा’ पाहून गंभीर खुश ! Video व्हायरल

Gautam Gambhir Reaction on Axar Patel Catch, IND vs ENG Semi-Final : भारत आताटी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक वेळा (चार वेळा) अंतिम फेरीत पोहोचणारा संघ ठरला आहे. 8 मार्च रोजी अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.

Gautam Gambhirl : खुर्चीतून उठला आणि.... बाऊंड्रीवर अक्षर पटेलचा कारनामा पाहून गंभीर खुश ! Video व्हायरल
गौतमी गंभीरची रिॲक्शन व्हायरल
Image Credit source: social media
| Updated on: Mar 06, 2026 | 1:46 PM

Gautam Gambhir Reaction on Axar Patel Catch, IND vs ENG Semi-Final : टी20 वर्ल्ड कप 2026 ची सेमीफयानल काल झाली. वानखेडेवर रंगलेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला आणि फायनमध्ये धडक मारली. 8 मार्च रोजी अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्यात अनेक खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली, पण काही चेंडू आणि फिल्डींगचे काही क्षण असे बोते, ज्यामुळे संपूर्ण सामना फिरला.

कॅच पाहून क्रिकेट प्रेमींचा रोखला गेला श्वास

कालच्या सामन्यात इंग्लंडचा विल जॅक्स क्रीझवर होता, तेव्हा मॅच कुठेही झुकू शकली असती. इंग्लंडची फलंदाजी आणि 14 वे षटक सुरू होते आणि अर्शदीप सिंगचा चेंडू ताब्यात होता. अर्शदीपने वाइड फुल टॉस टाकला, जो जॅकने जोरदार मारला. चेंडू बुलेटच्या वेगाने डीप पॉइंट बाउंड्रीकडे जात होता, पण तिथे जे घडले त्यामुळे लाखो भारतीयांचा श्वास अक्षरश: रोखला गेला. बाऊंड्री लाईनवर उभा असलेल्या अक्षर पटेलने कॅच पकडण्यासाठी लांब धाव घेतली. त्याने चित्त्याची चपळता दाखवत बॉल हवेतच पकडला, पण तेवढ्यात त्याचा तोल गेला आणि बाऊंड्री लाईनच्या बाहेर पडणार होता. मात्र अशा परिस्थितीत त्याने सॉलिड प्रसंगावधान दाखवत सीमारेषेला स्पर्श करण्यापूर्वीच तो चेंडू उडवला आणि जवळच असलेल्या शिवम दुबेने तो कॅच पकडण्यात कोणतीही चूक केली नाही. क2च पकडताच संपूर्ण स्टेडियम आवाजाने, जल्लोषाने, टाळ्यांनी दणाणून गेलं.

ही फक्त एक विकेट नव्हती, तर मॅचचा असा क्षण होता, ज्यामुळे इंग्लंडचं कंबरडंच मोडलं. विकेट गेल्यावर कॅप्टन सूर्याने धावत जाऊन अक्षरला घट्ट मिठी मारली. कारण अक्षरच्या या कॅचने विजय आणि पराभवातील अंतर क्षणात कमी केलं हे त्याला माहीत होतं.

 

कोच गंभीरचाही जोश हाय

या कॅचनंतर संपूर्ण संघाने जल्लोष केला. एवढंच नव्हे तर नेहमी शांत आणि गंभीर राहणारा टीम इंडियाचा कोच, गौतम गंभीर हाही त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही. ज्या क्षणी दुबेने तो कॅच पकडला,. गंभीर तडकन खर्चीवरून उठला आणि अतिशय जल्लोषात, जोरात त्याचे विकेटचं सेलिब्रेशन केलं. गंभीरचा हे ‘सेलिब्रेशन’ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालंय.

कालच्या विजयासह भारत हा टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक वेळा (चार वेळा) अंतिम फेरीत पोहोचणारा संघ बनला आहे. 8 मार्चला न्युझीलंडशी टीम इंडियाचा सामना होणार असून पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकण्यास खेळाडू उत्सुक आहेत.

Follow Us