AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वुमन्स वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी; शफाली वर्मा आऊट

वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघ्या एका महिन्याचा अवधी शिल्लक राहिला आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी संघाची घोषणा केली असून हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात संघ मैदानात उतरेल. चला जाणून घेऊयात 15 खेळाडूंबाबत

वुमन्स वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी; शफाली वर्मा आऊट
Image Credit source: BCCI Women Twitter
| Updated on: Aug 19, 2025 | 4:51 PM
Share

वुमन्स वर्ल्डकप 2025 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. ही स्पर्धा 30 सप्टेंबरपासून सुरु होणार असून 8 संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेत इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व राहिलं आहे. तर न्यूझीलंडने एकदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे यंदा जेतेपदाची चव चाखण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेला 1973 पासून सुरुवात झाली असून यंदा 13वं पर्व आहे. ऑस्ट्रेलियाने 7, इंग्लंडने 4 आणि न्यूझीलंडने जेतेपदावर एकदा नाव कोरलं आहे. त्यामुळे जेतेपदासाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे. नीतू डेविडच्या अध्यक्षतेकाली महिला निवड समितीने 15 खेळाडूंची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर संघाची धुरा असणार आहे. तर स्मृती मंधानाला उपकर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. तर प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्स या संघाचा भाग आहेत.

वुमन्स वर्ल्डकप संघातून शेफाली वर्माला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. शेफाली वर्माची कामगिरी गेल्या काही महिन्यात तशी काही खास नव्हती. त्यामुळे तिला या संघातून वगळण्यात आलं आहे. सध्या भारत अ संघासोबत ती ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. वनडे वर्ल्डकपसाठी निवडलेला संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ति शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रेणुका सिंह, अरुंधति रेड्डी, ऋचा घोष, क्रांति गौड़, अमनजोत कौर, राधा यादव, स्री चरणी, यास्तिका भाटिया, स्नेह राणा.

वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचा पहिला सामना 30 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. 5 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध, 9 ऑक्टोबरला दक्षिण अप्रिकेविरुद्ध, 12 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध, 19 ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्ध, 23 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध आणि 26 ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्ध सामना होणार आहे. भारत पाकिस्तान हा सामना हायब्रिड मॉडेलवर खेळला जाणार आहे. हा सामना तटस्थ ठिकाणी म्हणजेच कोलंबोत खेळला जाणार आहे. भारताचे इतर सामने बंगळुरु, इंदूर, गुवाहटी आणि विशाखापट्टणम येथे खेळला जाईल.

Follow Us
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा