4 ओव्हरसाठी कॅप्टन्सी केली, गेलेला सामना परत आणला, हिटमॅन रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव

| Updated on: Mar 19, 2021 | 11:47 AM

रोहित शर्माने केवळ चार ओव्हर्ससाठी कर्णधापद स्वीकारलं. पण याच चार ओव्हर्समध्ये त्याने इंग्लंडच्या गोटात गेलेला विजय परत भारताकडे खेचला. | Rohit Sharma

4 ओव्हरसाठी कॅप्टन्सी केली, गेलेला सामना परत आणला, हिटमॅन रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव
रोहित शर्मा
Follow us on

मुंबई : इंग्लंडविरुद्ध चौथ्या टी ट्वेन्टी सामन्यात (india Vs England 4th T20) हिटमॅन रोहित शर्माने (Rohit Sharma) कर्णधारपदाच्या भूमिकेत असताना चमकला. त्याने केवळ चार ओव्हर्ससाठी कर्णधापद स्वीकारलं. पण याच चार ओव्हर्समध्ये त्याने इंग्लंडच्या गोटात गेलेला विजय परत भारताकडे खेचून आणला. सोशल मीडियावर आता रोहित शर्माच्या कॅप्टन्सीचं कौतुक होत आहे तसंच टी ट्वेन्टीचं कर्णधारपद रोहित शर्माकडे द्या, अशी मागणीही होत आहे. (india Vs England 4th T20 Rohit Sharma Captaincy Appriciate Social media)

रोहितच्या केवळ चार ओव्हर्सच्या कॅप्टन्सीपुढे इंग्लंडने गुडघे टेकले

रोहितच्या केवळ चार ओव्हर्सच्या कॅप्टन्सीपुढे इंग्लंडने गुडघे टेकल्याचं पाहायला मिळालं. 16 व्या ओव्हरमध्ये कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेल्यामुळे रोहित शर्माला कॅप्टन्सी करावी लागली. ज्यावेळी रोहितकडे कॅप्टन्सी आली तो काळ संघासाठी अतिशय कठीण होता. पण याच दरम्यान रोहितने ज्या प्रकारे कॅप्टन्सी केली ती क्रिकेट रसिकांना फारच आवडली.

नेमकं काय केलं रोहित शर्माने??

शार्दुल ठाकूरच्या पहिल्या दोन ओव्हरमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगलेच रन्स काढले होते. त्याचा इकोनॉमी रेट हाय होता. परंतु अशाही परिस्थितीत रोहितने शार्दूल ठाकूरवर विश्वास दाखवला तसंच त्याचा हौसला बुलंद केला. त्याला सामन्यातली 17 वी ओव्हर टाकण्याची संधी दिली. शार्दुलने बेन स्टोक्स आणि इयोन मॉर्गन या महत्वाच्या फलंदाजांना सलग 2 चेंडूवर बाद केलं. त्यामुळे सामना टीम इंडियाच्या बाजूने झुकला. रोहितने दिलेला कानमंत्र शार्दुलने खरा ठरवला.

शार्दुलच्या 4 ओव्हरमध्ये 3 विकेट्स

शार्दुलने बेन स्टोक्स आणि इयॉन मॉर्गनला सलग 2 चेंडूवर बाद केलं. त्यामुळे त्याला हॅटट्रिकची संधी होती. पण त्याला हॅटट्रिक घेता आली नाही. पण यानंतर त्याने आणखी एक विकेट घेतली. शार्दुलने सामन्यातील शेवटची ओव्हर टाकली. यात त्याने 5 व्या चेंडूवर ख्रिस जॉर्डनला आऊट केलं. अशाप्रकारे शार्दुलने आपल्या 4 ओव्हरमध्ये 42 धावा देत निर्णायक क्षणी 3 विकेट्स घेतल्या.

5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी

टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली आहे. यामुळे मालिकेच्या दृष्टीने 5 वा सामना हा रंगतदार होणार आहे. हा 5 वा सामना 20 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

क्रिकेटरसिकांची रोहितवर स्तुतीसुमने

हे ही वाचा :

India vs England Odi Series 2021 | इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ गोलंदाजाला संधी

India vs England 4th 2Oi | इंग्लंडच्या पराभवामागे ‘हिटमॅन’चा मास्टरप्लान, शार्दुल ठाकूरला कानमंत्र आणि टीम इंडिया विजयी

रोहित शर्माची 10 वर्षांपूर्वी सूर्यकुमारच्या बॅटिंगबद्दल भविष्यवाणी, काय होतं ‘ते’ ट्विट?