AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : जिंकत नाही असं वाटत होतं तेवढ्यातच…; इंग्लंडविरुद्धचा सामना नक्की कुठे आणि कसा फिरला?

संजू सॅमसनच्या ८९ धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताने इंग्लंडसमोर २५४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. अक्षर पटेलचा अफलातून झेल आणि बुमराह-हार्दिकच्या टिच्चून केलेल्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने थरारक विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक दिली आहे.

IND vs ENG : जिंकत नाही असं वाटत होतं तेवढ्यातच...; इंग्लंडविरुद्धचा सामना नक्की कुठे आणि कसा फिरला?
Axar Patel
| Updated on: Mar 06, 2026 | 10:42 AM
Share

भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडवर मात केली. भारताने या विजयासह चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक दिली. भारताने इंग्लंडसमोर या सामन्यात 254 धावांचं लक्ष्य दिले होते. इंग्लंडने शेवटच्या बॉलपर्यंत याचा पाठलाग केला. मात्र केवळ 7 धावांनी इंग्लंडचा पराभव झाला आणि टीम इंडियाने थेट फायनलमध्ये धडक मारली. इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये जेकब बेथल याच्या शतकी खेळीच्या जोरावर 7 विकेट्स गमावून 246 धावा केल्या.

भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने वानखेडेच्या फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीचा पूर्ण फायदा उठवला. भारताच्या विजयाचा पाया संजू सॅमसनने रचला. त्याने अवघ्या ४२ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ८९ धावांची झंझावाती खेळी केली. विशेष म्हणजे सॅमसन १५ धावांवर असताना इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने त्याचा झेल सोडला आणि ती एक चूक इंग्लंडला प्रचंड महाग पडली. सॅमसनच्या या वादळी खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर २५४ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते.

याचा पाठलाग करताना इंग्लंडने भारताला कडवी झुंज दिली. मात्र, २० षटकांत इंग्लंडने ७ गडी गमावत २४६ धावांपर्यंतची मजल मारली. यावेळी भारतीय गोलंदाजांमध्ये काही उणिवा जाणत असल्या तरी क्षेत्ररक्षणाने हा सामना पूर्णपणे फिरवला. अक्षर पटेलने घेतलेला हॅरी ब्रूकचा डायव्हिंग कॅच सामन्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण ठरला. त्याशिवाय त्याने विल जॅक्स आणि फिल सॉल्टला बाद करण्यात मोलाची भूमिका बजावली.

भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना १८ व्या आणि १९ व्या षटकात पूर्णपणे फिरला. १८ व्या षटकात जसप्रीत बुमराहने अत्यंत अचूक गोलंदाजी करत केवळ ६ धावा दिल्या. त्यानंतर १९ व्या षटकात हार्दिक पंड्याने केवळ ९ धावा देत सॅम करनची महत्त्वाची विकेट घेतली. या दोन षटकांमुळे इंग्लंडला अखेरच्या षटकात विजयासाठी आवश्यक असणाऱ्या ३० धावा गाठणं कठीण झाले.

इतिहासाच्या उंबरठ्यावर भारत

भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. २०२४ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून जेतेपद पटकावले होते. आता न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवल्यास भारत हा सलग दोनदा टी-२० विश्वचषक जिंकणारा जगातील पहिला संघ ठरेल. तसेच यजमान देश म्हणून विश्वचषक जिंकणारा पहिला संघ असेल. त्यामुळे आता अंतिम सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
दुबईत अडकलेले खासदार कल्याण काळे अखेर संभाजीनगरमध्ये परतले
दुबईत अडकलेले खासदार कल्याण काळे अखेर संभाजीनगरमध्ये परतले.
व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांची 8 तास CID चौकशी!
व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांची 8 तास CID चौकशी!.
अजित पवारांची खूप आठवण येतेय; पार्थ पवारांचं भावनिक ट्विट
अजित पवारांची खूप आठवण येतेय; पार्थ पवारांचं भावनिक ट्विट.
राष्ट्रवादीच्या 20-25 आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
राष्ट्रवादीच्या 20-25 आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध, 7 उमेदवार थेट खासदार! अडसूळ मात्र नाराज
राज्यसभा निवडणूक बिनविरोध, 7 उमेदवार थेट खासदार! अडसूळ मात्र नाराज.
बिहारमध्ये राजकीय भूकंप! नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्री भाजपचा?
बिहारमध्ये राजकीय भूकंप! नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्री भाजपचा?.
सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंचे मानले आभार; काय आहे कारण?
सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंचे मानले आभार; काय आहे कारण?.
टीम इंडिया चौथ्यांद टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये!
टीम इंडिया चौथ्यांद टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये!.
जनतेचा, मित्रपक्षांचा मनापासून ऋणी; शरद पवारांचं ट्विट
जनतेचा, मित्रपक्षांचा मनापासून ऋणी; शरद पवारांचं ट्विट.
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.