AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : जिंकत नाही असं वाटत होतं तेवढ्यातच…; इंग्लंडविरुद्धचा सामना नक्की कुठे आणि कसा फिरला?

संजू सॅमसनच्या ८९ धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताने इंग्लंडसमोर २५४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. अक्षर पटेलचा अफलातून झेल आणि बुमराह-हार्दिकच्या टिच्चून केलेल्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने थरारक विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक दिली आहे.

IND vs ENG : जिंकत नाही असं वाटत होतं तेवढ्यातच...; इंग्लंडविरुद्धचा सामना नक्की कुठे आणि कसा फिरला?
Axar Patel
| Updated on: Mar 06, 2026 | 10:42 AM
Share

भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडवर मात केली. भारताने या विजयासह चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक दिली. भारताने इंग्लंडसमोर या सामन्यात 254 धावांचं लक्ष्य दिले होते. इंग्लंडने शेवटच्या बॉलपर्यंत याचा पाठलाग केला. मात्र केवळ 7 धावांनी इंग्लंडचा पराभव झाला आणि टीम इंडियाने थेट फायनलमध्ये धडक मारली. इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये जेकब बेथल याच्या शतकी खेळीच्या जोरावर 7 विकेट्स गमावून 246 धावा केल्या.

भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने वानखेडेच्या फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीचा पूर्ण फायदा उठवला. भारताच्या विजयाचा पाया संजू सॅमसनने रचला. त्याने अवघ्या ४२ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ८९ धावांची झंझावाती खेळी केली. विशेष म्हणजे सॅमसन १५ धावांवर असताना इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने त्याचा झेल सोडला आणि ती एक चूक इंग्लंडला प्रचंड महाग पडली. सॅमसनच्या या वादळी खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर २५४ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते.

याचा पाठलाग करताना इंग्लंडने भारताला कडवी झुंज दिली. मात्र, २० षटकांत इंग्लंडने ७ गडी गमावत २४६ धावांपर्यंतची मजल मारली. यावेळी भारतीय गोलंदाजांमध्ये काही उणिवा जाणत असल्या तरी क्षेत्ररक्षणाने हा सामना पूर्णपणे फिरवला. अक्षर पटेलने घेतलेला हॅरी ब्रूकचा डायव्हिंग कॅच सामन्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण ठरला. त्याशिवाय त्याने विल जॅक्स आणि फिल सॉल्टला बाद करण्यात मोलाची भूमिका बजावली.

भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना १८ व्या आणि १९ व्या षटकात पूर्णपणे फिरला. १८ व्या षटकात जसप्रीत बुमराहने अत्यंत अचूक गोलंदाजी करत केवळ ६ धावा दिल्या. त्यानंतर १९ व्या षटकात हार्दिक पंड्याने केवळ ९ धावा देत सॅम करनची महत्त्वाची विकेट घेतली. या दोन षटकांमुळे इंग्लंडला अखेरच्या षटकात विजयासाठी आवश्यक असणाऱ्या ३० धावा गाठणं कठीण झाले.

इतिहासाच्या उंबरठ्यावर भारत

भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. २०२४ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून जेतेपद पटकावले होते. आता न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवल्यास भारत हा सलग दोनदा टी-२० विश्वचषक जिंकणारा जगातील पहिला संघ ठरेल. तसेच यजमान देश म्हणून विश्वचषक जिंकणारा पहिला संघ असेल. त्यामुळे आता अंतिम सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...