AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 षटकात 33 धावा दिल्या, टीम इंडियातून बाहेरचा रस्ता, अष्टपैलू खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) कोलकात्यातील ईडन गार्डन मैदानात हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात पराभव झाल्यामुळे टीम इंडिया (Team India) स्पर्धेतून बाहेर पडली.

2 षटकात 33 धावा दिल्या, टीम इंडियातून बाहेरचा रस्ता, अष्टपैलू खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
Manoj Prabhakar
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Mar 02, 2021 | 1:42 PM
Share

मुंबई : क्रिकेट वर्ल्डकप 1996 (1996 Cricket World Cup) ज्यांनी पाहिला असेल, त्यांना माजी क्रिकेपटू विनोद कांबळीचे (Vinod Kambli) अश्रू आठवत असतील. श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) कोलकात्यातील ईडन गार्डन मैदानात हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात पराभव झाल्यामुळे टीम इंडिया स्पर्धेतून बाहेर पडली. टीम इंडियाला केवळ पराभवाचा धक्का बसला नव्हता, तर भारताला आणखी एक झटका बसला होता. तो होता भारताच्या अष्टपैलू क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा. तो अष्टपैलू खेळाडू म्हणजे मनोज प्रभाकर (Manoj Prabhakar) होय. मनोज प्रभाकर यांना श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्याच वेदनेतून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आजच्याच दिवशी 1996 मध्ये मनोज प्रभाकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले होते.

खरंतर या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 271 धावा केल्या होत्या. त्यावेळी ही धावसंख्या आव्हानात्मक होती. सचिन तेंडुलकरने 137 चेंडूत 137 धावा ठोकल्या होत्या. यामध्ये 8 चौकार आणि 5 दणदणीत षटकारांचा समावेश होता. मात्र सचिन धावबाद झाला होता. त्याशिवाय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनेने 80 चेंडूत 72 आणि संजय मांजरेकरने 32 धावांचं योगदान दिलं होतं.

श्रीलंकेकडून रवींद्र पुष्पकुमारा आणि कुमार धर्मसेना यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली होती.

मनोज प्रभाकर यांचा शेवटचा सामना

भारताच्या 271 धावांचं आव्हान घेऊन श्रीलंका मैदानात उतरली. सलामीवीर सनथ जयसूर्याने घणाघाती फलंदाजी केली. त्यामुळे श्रीलंकेने हा सामना 48.4 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं. जयसूर्याने 76 चेंडूत 79 धावा केल्या. हसन तिलकरत्नेने 98 चेंडूत 70 धावा ठोकल्या, तर कर्णधार अर्जुन रणतुंगाने 43 धावांची भर घातली.

भारतीय गोलंदाज मनोज प्रभाकर हे या सामन्यात महागडे ठरले. त्यांनी केवळ 4 षटकात तब्बल 47 धावा दिल्या. त्यापैकी 33 धावा तर अवघ्या 2 षटकात ठोकल्या. यानंतर मनोज प्रभाकर यांना टीममधून बाहेर करण्यात आलं. त्यामुळे निराश झालेल्या प्रभाकर यांनी तातडीने निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे तो सामना मनोज प्रभाकर यांच्यासाठी शेवटचा ठरला होता.

मनोज प्रभाकर यांची कारकीर्द

मनोज प्रभाकर यांनी टीम इंडियाकडून 39 सामने खेळले. त्यामध्ये त्यांनी 32.65 च्या सरासरीने 1600 धावा देत, 96 विकेट्स घेतल्या. तर भारताकडून खेळलेल्या 130 वन डे सामन्यात त्यांनी 1858 धावा देत, 157 फलंदाज बाद केले. प्रभाकर यांच्या नावावर 1 शतक आणि 9 अर्धशतकं, तर वन डेमध्ये 2 शतकं आणि 11 अर्धशतकं जमा आहेत.

संबंधित बातम्या 

On This Day | 116 धावांचा यशस्वी बचाव, जाडेजाच्या फिरकीची धमाल, विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाचा U 19 वर्ल्ड कप विजय

Vijay Hazare Trophy | सेहवागच्या पुतण्याचा धमाका, 9 व्या नंबरवर येऊन वादळी खेळी, तरीही टीमची बेईज्जती 

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली