AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुखापत नव्हे, विजय शंकरला परत पाठवण्यामागे दुसरंच कारण?

विजय शंकरच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. पण सूत्रांच्या माहितीनुसार, विजय शंकरला भारतात परत पाठवण्यामागे विजय शंकरची दुखापत हे कारण नाही. त्याची कामगिरी पाहता संघात त्याच्यासाठी योग्य स्थान नसल्यामुळेच त्याला वगळण्यात आल्याचं बोललं जातंय.

दुखापत नव्हे, विजय शंकरला परत पाठवण्यामागे दुसरंच कारण?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 01, 2019 | 8:34 PM
Share

लंडन : विश्वचषकात टीम इंडियाला आणखी एक धक्का बसलाय. दुखापतीमुळे अष्टपैलू विजय शंकर विश्वचषकातून बाहेर पडलाय. त्याच्या जागी सलामीवीर मयांक अग्रवालला संधी देण्यात आली. विजय शंकरच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. पण सूत्रांच्या माहितीनुसार, विजय शंकरला भारतात परत पाठवण्यामागे विजय शंकरची दुखापत हे कारण नाही. त्याची कामगिरी पाहता संघात त्याच्यासाठी योग्य स्थान नसल्यामुळेच त्याला वगळण्यात आल्याचं बोललं जातंय.

सूत्रांच्या माहितीनुसार, संधी देऊनही विजय शंकरला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून विश्वास मिळवून देता आला नाही. याबाबतीत संघव्यवस्थापन आणि बीसीसीआयचा विश्वास मिळवण्यात त्याला अपयश आलं आणि त्याची रवानगी करण्यात आली.

जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर सराव करताना विजय शंकरच्या बोटाला दुखापत झाली होती. पण ती दुखापत अत्यंत किरकोळ होती. यानंतर तो फिटनेस टेस्टमध्येही पास झाला. पण इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रिषभ पंतला संधी देण्यासाठी विजय शंकरला वगळण्यात आलं. विजय शंकरला वगळण्यासाठी त्याची दुखापत हे कारण नव्हतं, असंही सूत्रांनी सांगितलंय.

सलामीवीर शिखर धवन माघारी परतल्यामुळे टीम इंडियाच्या सलामीचा प्रश्न निर्माण झालाय. केएल राहुल फॉर्ममध्ये दिसत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, या परिस्थितीमध्ये विजय शंकरला संघात ठेवण्यात काहीही अर्थ नव्हता. पण आयसीसीच्या नियमांनुसार फक्त दुखापतीच्या कारणास्तवच खेळाडू बदलला जाऊ शकतो.

सलामीला अपयशी ठरलेल्या केएल राहुलला आता चौथ्या क्रमांकावर खेळवलं जाण्याची रणनीती असल्याची माहिती आहे. कारण, पहिल्या क्रमांकावर फलंदाजीसाठी भारताकडे मयांक अग्रवालचा पर्याय आहे. तो एक स्फोटक फलंदाज म्हणूनही ओळखला जातो. शिखर धवन माघारी परतलाय, गोलंदाज भुवनेश्वर कुमार बसून आहे, त्यात विजय शंकर हा एक अतिरिक्त खेळाडू बनला होता.

भारतासाठी पुढील दोन सामने महत्त्वाचे आहेतच, पण त्यापेक्षाही महत्त्वाचा सेमीफायनल असेल. त्याअगोदर दोन सामन्यात चौथ्या क्रमांकासाठी आणि सलामीसाठी प्रयोग करुन पाहण्याची संधी भारताकडे आहे. त्यामुळे राहुलला चौथ्या क्रमांकावर आणि मयांकला सलामीला उतरवण्यासाठीच विजय शंकरला परत पाठवलं असल्याची माहिती आहे. भारत 2 जुलैला बांगलादेश आणि 6 जुलैला श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघांमध्ये सेमीफायनल सामने होतील.

Follow Us
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा