AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kho Kho World Cup 2025 Final : वूमन्सनंतर मेन्स टीम इंडिया खो खो वर्ल्ड कप चॅम्पियन , अंतिम सामन्यात नेपाळवर विजय

Mens Kho Kho World Cup 2025 Final Match Result : मेन्स टीम इंडियाने अंतिम सामन्यात नेपाळचा धु्व्वा उडवत पहिल्यावहिल्या खो खो वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे.

Kho Kho World Cup 2025 Final : वूमन्सनंतर मेन्स टीम इंडिया खो खो वर्ल्ड कप चॅम्पियन , अंतिम सामन्यात नेपाळवर विजय
mens team india win kho kho world cup 2025Image Credit source: Kkwcindia X Account
| Updated on: Jan 19, 2025 | 10:48 PM
Share

वूमन्सनंतर आता अवघ्या काही मिनिटांनी मेन्स खो खो टीम इंडियाने इतिहास रचला आहे. मेन्स टीम इंडियाने पहिलावहिला खो खो वर्ल्ड कप जिंकला आहे. मेन्स टीम इंडियाच्या या विजयाने भारताचा आनंद द्विगुणित झाला आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्यावहिल्या खो खो वर्ल्ड कपमध्ये भारताचा दबदबा पाहायला मिळाला. टीम इंडियाच्या मेन्स आणि वूमन्स दोन्ही संघांनी अंतिम फेरीत नेपाळचाच पराभव केला. त्यामुळे नेपाळच्या दोन्ही संघांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. मेन्स टीम इंडिया या स्पर्धेत अजिंक्य राहिली. टीम इंडियाने अंतिम सामन्यात नेपाळवर 54-36 अशा फरकाने विजय मिळवला. या विजयानंतर टीम इंडियाचं सोशल मीडियावर अभिनंदन केलं जात आहे.

पहिल्या सत्रात टीम इंडियाची कडक सुरुवात

टीम इंडियाने या महाअंतिम सामन्यातील पहिल्या सत्रात अप्रतिम सुरुवात केली. तसेच दुसऱ्या बाजूला नेपाळला एकही पॉइंट मिळवून दिला नाही. टीम इंडियाने या सत्रात 26 पॉइंट्स मिळवले. तर नेपाळला खातंही उघडू दिलं नाही. टीम इंडियाने अशाप्रकारे पहिल्या सत्रानंतर 26-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली.

नेपाळचं कमबॅक मात्र भारताकडेच आघाडी

नेपाळने दुसऱ्या सत्रात खातं उघडलं आणि कमबॅक केलं. मात्र टीम इंडियाने 8 पॉइंट्सने आघाडी कायम ठेवली. नेपाळने दुसऱ्या सत्रात एकूण 18 पॉइंट्स मिळवले.

तिसऱ्या सत्रात भारताचं कमबॅक

टीम इंडियाने तिसऱ्या सत्रात दणक्यात कमबॅक केलं आणि नेपाळला सामन्यातून बाहेर केलं. टीम इंडियाने तिसर्‍या सत्रात पॉइंट्सची लयलूट केली आणि 50 पार मजल मारली.

टीम इंडिया खो खो वर्ल्ड चॅम्पियन

टीम इंडियाने तिसऱ्या सत्रातील आघाडी चौथ्या सत्रातही कायम ठेवली आणि नेपाळवर सलग दुसऱ्यांदा मात करत अंतिम सामना हा 54-36 अशा फरकाने जिकंला. टीम इंडिया यासह विश्व विजेता ठरली.

दरम्यान टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील नेपाळवरील दुसरा विजय ठरला. दोन्ही संघ साखळी फेरीत आमनेसामने होते. टीम इंडियाने साखळी फेरीतही नेपाळला पराभवाची धुळ चारली होती. या स्पर्धेत एकूण 20 संघांनी सहभाग घेतला होता. या 19 संघांवर वरचढ ठरत टीम इंडियाने हा वर्ल्ड कप जिंकला.

Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.