AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant IPL 2022 : ऋषभ पंतचे सलग तीन षटकार, शेवटच्या बॉलवर गोलंदाजाने फसवले

विशेष म्हणजे ऋषभ पंतने एका षटकात तीन षटकार लगावले, तेही सलग चेंडूवरती त्यामुळे तो मोठी खेळी साकारेल असं वाटतं होतं. पण श्रेयस गोपालच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला.

Rishabh Pant IPL 2022 : ऋषभ पंतचे सलग तीन षटकार, शेवटच्या बॉलवर गोलंदाजाने फसवले
ऋषभ पंतचे सलग तीन षटकारImage Credit source: twitter
| Updated on: May 06, 2022 | 3:10 PM
Share

मुंबई – आयपीएलचे (IPL 2022) सामने जसे होतील तशी सामन्यातील रंगत अधिक वाढत आहे. काल झालेल्या सामन्यात अधिक चांगले फटके पाहायला मिळाले. दिल्ली कॅपिटल (Delhi Capitals) आणि सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) सामना होता. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉन मैदानात होता. कालच्या सामन्यात दिल्लीचे कॅप्टन ऋषभ पंत याच्याकडून चांगली खेळी होण्याची शक्यता दिसत होती. परंतु काही काळ मैदानावर तो स्थिरावल्यानंतर बाद झाला. त्याने 18 बॉलमध्ये 26 धावा केल्या. त्यामध्ये तीन षटकार आणि एक चौकाराचा समावेश आहे.

एका षटकात तीन षटकार लगावले

विशेष म्हणजे ऋषभ पंतने एका षटकात तीन षटकार लगावले, तेही सलग चेंडूवरती त्यामुळे तो मोठी खेळी साकारेल असं वाटतं होतं. पण श्रेयस गोपालच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. श्रेयस गोपाल सामन्यातील नववं षटक टाकत होता. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर ऋषभ पंतने षटकार लगावले. पण शेवटच्या चेंडूवर श्रेयस गोपालने चेंडू मागच्या बाजूने वळवला, त्यावेळी चेंडू ऋषभ पंतच्या बॅटला लागून विकेट किपरच्या हातात झेल गेला. त्यावेळी ऋषभ पंतचे चाहते नाराज झाले.

श्रेयस गोपालची ओव्हर

पहिला बॉल – 0 धावा दुसरा बॉल- 6 धावा तिसरा बॉल – 6 धावा चौथा बॉल – 6 धावा पाचवा बॉल – 4 धावा सहावा बॉल – विकेट

डेव्हिड वॉर्नरची तुफान खेळी

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 3 गडी गमावून 207 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने 58 चेंडूत 12 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 92 धावा केल्या. तसेच रोमन पॉवेलने 35 चेंडूंत 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 67 धावांची खेळी केली. वॉर्नर आणि रोमन पॉवेल यांनी चौथ्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली. दोघांनी तुफान फलंदाजी केल्याने दिल्लीच्या 207 धावा झाल्या.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.