AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहितचं शतक जवळ आलं आणि विराटने डाव घोषित केला, चाहते चिडले

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटीत भारताने पहिला डाव सात बाद 443 धावांवर घोषित केला. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी झालेल्या 170 धावांच्या भागीदारीमुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत आला. पण भारतीय चाहते कर्णधार विराट कोहलीवर नाराज झाले आहेत. रोहित शर्माचं शतक विराटमुळे चुकल्याचा आरोप चाहते करत आहेत. 443 धावसंख्येवर रवींद्र जाडेजा बाद झाला […]

रोहितचं शतक जवळ आलं आणि विराटने डाव घोषित केला, चाहते चिडले
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM
Share

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटीत भारताने पहिला डाव सात बाद 443 धावांवर घोषित केला. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी झालेल्या 170 धावांच्या भागीदारीमुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत आला. पण भारतीय चाहते कर्णधार विराट कोहलीवर नाराज झाले आहेत. रोहित शर्माचं शतक विराटमुळे चुकल्याचा आरोप चाहते करत आहेत.

443 धावसंख्येवर रवींद्र जाडेजा बाद झाला आणि विराटने डाव घोषित केला. त्यावेळी रोहित शर्मा 63 धावांवर खेळत होता. रोहितची लय पाहता ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर तो आपलं पहिलं शतक नक्की ठोकणार असं वाटत होतं. पण विराट कोहलीच्या निर्णयाने रोहित शर्माचे चाहते चांगलेच नाराज झाले. काही चाहत्यांनी विराट कोहलीच्या निर्णयाची तुलना राहुल द्रविडच्या त्या निर्णयाशी केली, जेव्हा सचिन तेंडुलकर 194 धावांवर असताना पाकिस्तानविरुद्ध खेळवण्यात आलेल्या मुल्तान कसोटीत द्रविडने डाव घोषित केला होता.

भारताने सात बाद 443 धावांवर असताना डाव घोषित केला आणि ऑस्ट्रेलियाला खेळण्याची संधी दिली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता आठ धावा केल्या होत्या. विराट आणि पुजाराने 215 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. त्यांनी भारताला 300 धावसंख्येच्या जवळ नेलं.

मिचेल स्टार्कने 293 धावांवर असताना कोहलीला 82 धावांवर बाद केलं. पुजाराही जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्याला पॅट कमिन्सने बाद केलं. चेतेश्वर पुजाराने 319 चेंडूंचा सामना करत 10 चौकारांच्या मदतीने 106 धावांची खेळी केली. यानंतर अजिंक्य रहाणे (34) आणि रोहित शर्मा (नाबाद 63) यांनी भारताचा डाव सावरला.

रहाणे बाद झाल्यानंतरही ऑस्ट्रेलियाच्या अडचणी कमी झाल्या नाही. रोहित शर्माने रहाणे बाद झाल्यानंतर युवा फलंदाज रिषभ पंतसोबत सहाव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. रिषभनंतर जाडेजा आला. जाडेजा लवकरच बाद झाला आणि त्यानंतर भारताने डाव घोषित केला.

Follow Us
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा