AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji Final : सौराष्ट्र संघ ठरला 2023 चा रणजी चॅम्पियन, जयदेव उनाडकट ‘मॅन ऑफ द मॅच’

Ranji Final : रणजी स्पर्धेच्या फायनलमध्ये बंगाल संघाचा पराभव करत सौराष्ट्रने 2023 च्या रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

Ranji Final : सौराष्ट्र संघ ठरला 2023 चा रणजी चॅम्पियन, जयदेव उनाडकट 'मॅन ऑफ द मॅच'
| Updated on: Feb 19, 2023 | 1:33 PM
Share

कोलकाता : रणजी स्पर्धेच्या फायनलमध्ये बंगाल संघाचा पराभव करत सौराष्ट्रने 2023 च्या रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. कर्णधार जयदेव उनाडकटच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या सौराष्ट्र संघाने गेल्या तीन वर्षात दोनवेळा रणजी स्पर्धा सौराष्ट्रने जिंकली आहे. फायनलमध्ये सौराष्ट्रने बंगालवर 9 विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. जयदेव उनाडकटच्या भेदक गोलंदाजीसमोर बंगाल संघाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. एकट्या जयदेवने बंगालच्या दुसऱ्या डावातील 6 विकेट्स घेतल्या. या कामगिरीच्या जोरावर जयदेवला ‘मॅन ऑफ द मॅच’ या पुरस्काराने गौरवण्यात आलं.

फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगाल संघाने 174 धावा केल्या होत्या. यामध्ये शाहबाद अहमदने सर्वाधिक 69 आणि अभिषेक पोरलने 50 धावा केल्या होत्या. सौराष्ट्रने त्यांच्या पहिल्या डावात 404 धावाांचा मोठा डोंगर उभा केला. त्यानंतर दुसऱ्या डावातही बंगालला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं नाही. बंगाल संघाचा 241 धावांवर डावातही दुसरा डाव आटोपला यामध्ये जयदेव उनाडकटने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. त्यानंतर सौराष्ट्रने 1 गडी गमावत 14 धावांचं लक्ष्य पूर्ण करत 9 विकेट्सने विजय मिळवला.

जयदेव उनाडकटने एकूण आठ विकेट्स घेतल्या आहेत. या कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर मॅन ऑफ द टूर्नामेंट म्हणून अर्पित वसवदा या खेळाडूला गौरवण्यात आलं. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सौराष्ट्र संघाचे हे दुसरे विजेतेपद आहे. जयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्रच्या संघाने 2019-20 मध्ये पहिले विजेतेपद पटकावले. गेल्या 11 हंगामांबद्दल बोलायचे झाल्यास, सौराष्ट्र संघाने 5 फायनल खेळल्या आहेत, दोनवेळा जिंकले आणि तीनदा पराभूत झाले होत. गेल्या वर्षीही उपांत्य फेरी गाठण्यात संघाला यश आलं होतं.

दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याआधी जयदेव उनाडकटला संघातून रीलीज करण्यात आलं होतं. सौराष्ट्र संघाच्या फायनलसाठी त्याला कसोटी संघातून बीसीसीआयने रीलीज करण्याचा निर्णय घेतला होता. जयदेवनेही या संधीचं सोन करत सौराष्ट्रला फायनल जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.

Follow Us
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.